पोस्ट्स

विदर्भाचा युवा दिग्दर्शक ठरतोय मराठी हॉररचा नवा चेहरा.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने नवे प्रयोग करत यशाची नवी उंची गाठणाऱ्या युवा दिग्दर्शकांमध्ये प्रीतम एस. के. पाटील यांचे नाव आज अग्रक्रमाने घेतले जाते. 'अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या दमदार यशानंतर आता 'घबाडकुंड' ला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादाने त्यांनी सलग दोन यशस्वी हॉररपट देत मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विदर्भातील यवतमाळसारख्या शहरातून आलेल्या प्रीतम पाटील यांनी आपल्या कल्पक दिग्दर्शनाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. शॉर्ट फिल्म्स, वेबसिरीज तसेच 'खिचिक', 'डॉक्टर डॉक्टर' आणि 'ढिशक्यांव' यांसारख्या चित्रपटांनंतर 'अल्याड पल्याड' आणि 'घबाडकुंड' या दोन सलग यशस्वी हॉररपटांनी त्यांच्या नावावर बॅक-टू-बॅक हिट्सची नोंद झाली आहे.    विशेष म्हणजे, 'घबाडकुंड' च्या माध्यमातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला पहिले सिनेमॅटिक युनिव्हर्स दिले. भय, रहस्य, अॅक्शन, इमोशन आणि थराराचा अनोखा मिलाफ असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, बॉक्स ऑफिसवरही चित्...

ग्रॅमी पुरस्कार विजेते पद्मश्री श्री.शंकरजी महादेवन आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सन्मानित रीवा राठोड यांच्या सुमधुर स्वरांतून साकारलेलं भक्तिगीत प्रेक्षकांच्या भेटीला,

इमेज
आषाढी वारीचे भक्तिमय वातावरण, विठ्ठल नामाचा अखंड गजर आणि वारकऱ्यांच्या अढळ श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव देणारं ‘पालखी निघाली वारीला’ हे नवीन भक्तिगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. नुकतेच या गाण्याचे अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. विठ्ठलनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि वारकऱ्यांच्या अखंड भक्तीभावात रंगलेलं हे गाणं प्रत्येकाला वारीचा आध्यात्मिक अनुभव देत आहे.     या गाण्याला सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि मधुर आवाजाची गायिका रीवा राठोड यांनी आपल्या सुरांनी समृद्ध केलं आहे. ज्येष्ठ गायक-संगीतकार रूप कुमार राठोड आणि गायिका सुनाली राठोड यांची कन्या असलेल्या रीवाने या गीताच्या माध्यमातून प्रथमच मराठीत गायन केलं असून, तिच्या सुरेल आवाजाने या भक्तिगीताला एक वेगळीच भावस्पर्शी उंची मिळाली आहे. ज्येष्ठ संगीतकार रूप कुमार राठोड यांनी या गाण्याला संगीत दिलं असून, डॉ. दीपक वझे यांनी विठ्ठलभक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचं सार शब्दांत प्रभावीपणे मांडलं आहे.या गाण्याची सुंदर ध्वनिचित्रफित सौ.श्वेता परुळकर यांनी केली आहे.हे गाणे डीएफएफने प्र...

'द इंडिया स्टोरी : स्लो पॉइझन इन प्रोग्रेस'चा ट्रेलर प्रदर्शित..

इमेज
'द इंडिया स्टोरी : स्लो पॉइझन इन प्रोग्रेस' या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला असून, कीटकनाशक शेतीच्या गंभीर समस्येवर आणि तिच्या समाजावर होणाऱ्या दूरगामी परिणामांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रभावी भूमिका असलेला हा चित्रपट दडलेले सत्य उलगडत लाखो लोकांच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या वाढत्या संकटाची जाणीव करून देतो. दमदार नाट्य, प्रभावी अभिनय आणि सामाजिक आशयाने परिपूर्ण असा हा ट्रेलर सत्य, न्याय आणि जिद्दीच्या प्रेरणादायी प्रवासाची झलक दाखवतो. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज यांच्या सहकार्याने साकारलेल्या 'द इंडिया स्टोरी' या चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन डीके यांनी केले असून, कथा, पटकथा आणि निर्मिती सागर बी. शिंदे यांची आहे. हा चित्रपट २४ जुलै २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.   ट्रेलरबद्दल बोलताना दिग्दर्शक चेतन डीके म्हणाले, "'द इंडिया स्टोरी' हा केवळ चित्रपट नाही, तर समाजाने करायलाच हवा असा एक महत्त्वाचा संवाद आहे. प...

नीलमताई शिर्के - सामंत,यांचा दिवंगत सचिन माने, यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात .

इमेज
आचार्य अत्रे रंगमंदिराचे साऊंड ऑपरेटर कै. सचिन माने यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंब संकटात सापडले होते. आज त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार दिला. कुटुंबाला 'श्री श्री बालाजी' संस्थेतर्फे १ लाख रुपये आणि बालरंगभूमी परिषद, मध्यवर्तीतर्फे १०,००० रुपयांची आर्थिक मदत दिली. इतकेच नव्हे, तर त्यांच्या पत्नीला नोकरी आणि मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. या कठीण काळात आम्ही माने कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

'सामना' या चित्रपटाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आणि स्व.निळू फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'सामना' या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन…

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते स्वर्गीय निळू फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि सामना या चित्रपटास ५० वर्षे पूर्ण झाली या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त 'महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळा'च्या 'दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळा'तर्फे सामना' या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आणि चित्रपट निर्माते रामदास फुटाणे व दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्याशी संवाद आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम शनिवार दि.१८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथील तिसऱ्या मजल्यावरील लघुनाट्यगृहात होणार आहे.   मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड  ठरलेल्या या चित्रपटात डॉ.श्रीराम लागू आणि निळू फुले यांची प्रमुख भूमिका असून रामदास फुटाणे यांनी निर्माता म्हणून तर डॉ. जब्बार पटेल यांचं दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाद्वारे चित्रसृष्टीत पदार्पण केलं. चित्रपटाची कथा विजय तेंडुलकर यांनी लिहिली असून संगीत हे पंडित भास्कर चंदावरकर यांनी दिले आहे . तसेच  या चित्रपटात मोहन आगाशे, विलास रकटे,  स्मिता पाटील अशा मान्यवर कलाकारांनीही...

‘भूतम भयम्’साठी करण सोनावणे शिकला मालवणी भाषा.

इमेज
सोशल मीडियावर आपल्या भन्नाट विनोदांनी आणि सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा ‘ऑरेंज ज्यूस गँग’मधील करण सोनावणे आता मोठ्या पडद्यावरही तितक्याच दमदार अंदाजात झळकणार आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्’मध्ये करण एका अस्सल मालवणी तरुणाच्या भूमिकेत दिसणार असून, या भूमिकेला वास्तवदर्शी बनवण्यासाठी त्याने खास मालवणी भाषा शिकण्याची मेहनत घेतली आहे.    करण मुळात मालवणी भाषिक नसतानाही त्याने या भूमिकेसाठी स्वतःवर विशेष मेहनत घेतली. फक्त संवाद पाठ करून न थांबता, मालवणी भाषेची लकब, उच्चार, शब्दफेक आणि बोलण्याची सहज शैली समजून घेण्यासाठी त्याने सातत्याने सराव केला. यासाठी त्याने आपल्या मालवणी मित्रांची, चित्रपटाच्या सेटवरील मालवणी सहकाऱ्यांची मदत घेतली. संवादांमधील प्रत्येक शब्द नैसर्गिक वाटावा, पडद्यावर कुठेही कृत्रिमपणा जाणवू नये, यासाठी त्याने अनेकदा संवादांची उजळणी करत भाषेवर प्रभुत्व मिळवलं.    याबद्दल करण सोनावणे म्हणाला, “या चित्रपटात मी साकारत असलेलं पात्र मालवणी असल्याचं समजलं, तेव्हाच मला ज...

ज्या समर्थ विचारांनी आयुष्याला दिशा दिली, त्याच संस्कारांची नव्याने आठवण करून देणारी एक कथा...

इमेज
समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. आधुनिक जीवनातील धावपळ, कुटुंबातील मतभेद आणि अध्यात्मातून जीवनाला मिळणारी नवी दिशा यांची भावस्पर्शी झलक या टीझरमधून पाहायला मिळते. टीझरमध्ये एका सामान्य कुटुंबाच्या आयुष्यात घडणारे अनपेक्षित वळण उलगडताना दिसते. एका बाजूला अध्यात्माकडे झुकणाऱ्या वडिलांचा प्रवास, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारसरणी असलेल्या मुलाचा त्याला असलेला विरोध—या दोन पिढ्यांतील संघर्ष अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. समर्थ रामदास स्वामींचे विचार हे केवळ धार्मिकतेपुरते मर्यादित नसून, जीवन जगण्याची योग्य दिशा देणारे आहेत, हे टीझर सूचकपणे अधोरेखित करतो.    या विचारांचा या कुटुंबावर नेमका काय परिणाम होईल? वडील आणि मुलामधील दुरावा कमी होईल का? समर्थांच्या शिकवणीतून त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना मिळणार आहेत.    दिग्दर्शक...