पोस्ट्स

झी टॉकीजवर ‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’ कार्यक्रमातून अनुभवता येणार विठ्ठलभक्तीचा उत्सव.

इमेज
आषाढी वारी म्हणजे विठ्ठलभक्ती, नामस्मरण आणि अध्यात्माचा अखंड उत्सव. लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलनामाचा गजर करत मार्गक्रमण करतात. या भक्तिमय वातावरणाचा आनंद प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी झी टॉकीजने खास आषाढी सोहळ्याचे आयोजन केले असून, त्याअंतर्गत ‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’ हा विशेष कार्यक्रम दररोज सकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार ह.भ.प. प्रकाश साठे महाराज आणि अनुराधा ताई यांच्या प्रभावी कीर्तनातून संतवाङ्मय, वारकरी संप्रदायाची परंपरा, विठ्ठलभक्ती आणि जीवनाला सकारात्मक दिशा देणारे विचार प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत. ओघवती वाणी, अभ्यासपूर्ण निरूपण आणि भक्तिरसाने भारावलेले वातावरण यामुळे प्रत्येक भाग हा अध्यात्माचा आनंद देणारा ठरणार आहे.     आषाढी वारीचा आनंद प्रत्येकापर्यंत पोहोचावा या हेतूने झी टॉकीजतर्फे ‘भेटी लागे जीवा’ हा विशेष कार्यक्रम वृद्धाश्रमात आयोजित करण्यात आला आहे. भक्ती, कीर्तन आणि आपुलकीचा सुंदर संगम घडवणाऱ्या या उपक्रमातून ज्येष्ठ नागरिकांसोबत विठ्ठलभक्तीचा आनंद साजरा ...

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

इमेज
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ हा बहुचर्चित मराठी हॉरर-कॉमेडी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हॉरर, कॉमेडी आणि रहस्याचा भन्नाट संगम असलेल्या या चित्रपटाचं सर्व स्तरांतून कौतुक होत असतानाच आता प्रेक्षकांसाठी आणखी एक खास सरप्राईज समोर आलं आहे. चित्रपटात आधीच दमदार कलाकारांची फौज असताना आता आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेचा खुलासा करण्यात आला आहे. अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव या चित्रपटात ‘मया’ ही अतिशय वेगळी आणि रहस्यमय भूमिका साकारत आहे.    चित्रपटातील ‘मया’ हा विचित्र स्वभावाचा, अनाकलनीय आणि प्रेक्षकांना सतत संभ्रमात ठेवणारा आहे. त्याच्या प्रत्येक हालचालीमागे एक गूढ दडलं असून तो कथेला अनपेक्षित वळण देतो. हा मया नेमका कोण आहे? त्याचा या सगळ्याशी काय संबंध आहे? आणि तो नेमकं काय करतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र चित्रपट पाहिल्यानंतरच मिळणार आहेत.    याविषयी प्रियांदर्शन जाधव म्हणाला, ‘’ ‘भूतम भयम्’चा भाग होणं हा माझ्यासाठी खूप वेगळा आणि आनंददायी...

दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या प्राथमिक पुनर्विकास आराखड्यासह चित्रपट धोरणाचा मसुदा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांना सादर.

इमेज
महाराष्ट्र शासनाच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सर्वांगीण पुनर्विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले असून, चित्रनगरीच्या प्राथमिक पुनर्विकासाचा आराखडा तसेच राज्याच्या चित्रपट धोरणाचा मसुदा बुधवार दिनांक २२ जुलै २०२६ रोजी चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडे सादर केला.      यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, उप सचिव महेश वाव्हळ, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार मुख्य लेखा वित्त अधिकारी चित्रलेखा खातू उपस्थित तसेच चित्रनगरीसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.       राज्यातील चित्रपट, दूरचित्रवाणी, ओटीटी आणि डिजिटल कंटेंट उद्योगाला जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशासह निर्मात्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व आधुनिक सुविधाचा समावेश पुनर्विकास आराखड्यात करण्यात आला आहे.      याचबरोबर महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक चित्रपटस्नेही राज्य म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात ...

प्रदर्शनापूर्वीच ‘भूतम भयम्’ची जोरदार हवा!चाहते आणि इन्फ्लुएन्सर्सकडून भरभरून कौतुक, आजपासून सर्वत्र प्रदर्शित.

इमेज
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांच्या मनात घर करणं, हे प्रत्येक चित्रपटाचं स्वप्न असतं. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित आगामी हॉरर-कॉमेडी ‘भूतम भयम्’ने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं आहे. ट्रेलर, गाणी आणि चित्रपटाची भन्नाट झलक पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता आता अक्षरशः चाहत्यांच्या प्रेमात रूपांतरित झाली असून, चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. याच प्रेमाची खास दखल घेत ‘ऑरेंज ज्यूस गँग’ने चाहत्यांसाठी एक्सक्लुझिव्ह फॅन स्क्रीनिंगची घोषणा केली. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच मोठ्या पडद्यावर ‘भूतम भयम्’ अनुभवण्याची संधी मिळणार असल्याचं समजताच चाहत्यांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. सोशल मीडियावर घोषणा होताच गुगल फॉर्मद्वारे हजारोंची नोंदणी झाली आणि हा क्षण चित्रपटाविषयी असलेल्या विश्वासाची आणि कमालीच्या उत्सुकतेची साक्ष देणारा ठरला.     फॅन स्क्रीनिंगसोबतच निवडक इन्फ्लुएन्सर्ससाठीही विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. या स्क्रीनिंगनंतर सोशल मीडियावर चित्रपटाचे भरभरून कौतु...

'द इंडिया स्टोरी' : काजल अग्रवाल, श्रेयस तळपदे, दिग्दर्शक चेतन डीके आणि निर्माता सागर बी. शिंदे यांनी घेतली एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांची भेट.

इमेज
प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असलेल्या 'द इंडिया स्टोरी' या चित्रपटाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असताना, चित्रपटातील प्रमुख कलाकार काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे, तसेच दिग्दर्शक चेतन डीके आणि लेखक-निर्माते सागर बी. शिंदे यांनी प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांची सदिच्छा भेट घेतली.      सार्वजनिक आरोग्य आणि अन्नसुरक्षेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाला चित्रपटाच्या माध्यमातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तुकाराम मुंडे यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले. या भेटीनंतर त्यांनी सोशल मीडियावरही आपल्या भावना व्यक्त करत, लाखो लोकांच्या जीवनाशी निगडित असलेल्या या गंभीर विषयावर चित्रपट भाष्य करत असल्याचा आनंद व्यक्त केला आणि चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री काजल अग्रवाल यांनीदेखील मुंडे यांच्या प्रामाणिकपणा, कार्यतत्परता आणि जनसेवेप्रती असलेल्या समर्पणाबद्दल आपला आदर व्यक्त केला. त्यामुळे ही भेट अधिक अर्थपूर्ण ठरली.       झी स्टुडिओज प्रस्तुत आणि एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज यांच्या सहयोगान...

आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात ‘मन मंदिरा - गजर भक्तीचा’मध्ये नामस्मरणाचा सुरेल सोहळा.

इमेज
आषाढी एकादशी म्हणजे विठुरायाच्या भक्तीचा, हरिनामाच्या गजराचा आणि वारकरी परंपरेच्या अखंड श्रद्धेचा पवित्र उत्सव. राज्यभरातील लाखो भाविक ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात विठ्ठलनामात तल्लीन होतात. याच भक्तिमय वातावरणाची अनुभूती आता घरबसल्या घेता येणार आहे ती झी टॉकीजवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘मन मंदिरा – गजर भक्तीचा’मधून. भक्ती, अध्यात्म आणि कीर्तन परंपरेचा सुंदर संगम घडवणारा हा कार्यक्रम दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्याचे विशेष महत्त्व अधिकच वाढले आहे. कीर्तन, अभंग, भारूड आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरातून महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचे दर्शन या कार्यक्रमात घडणार आहे.    या विशेष पर्वात महाराष्ट्रातील मान्यवर कीर्तनकार आपल्या प्रभावी निरूपणातून भक्तिरसाची उधळण करणार आहेत. सोपान सानप, संगीता चोपडे, अविनाश भारती, प्रकाश साठे, भानुदास बैरागी आणि गौरीताई सांगळे हे नामवंत कीर्तनकार आपल्या ओजस्वी वाणीने, संतविचारांनी आणि अभंगांच्या सुरेल सादरीकरणातून प्रेक्षकांना भक्तीच्या अनोख्या विश्वात घेऊन जाणार आहेत.   संत ज्ञानेश्वर, संत तुकारा...

‘काटकोन त्रिकोण’ - तीन व्यक्तिरेखा, तीन विचार आणि नात्यांच्या गुंतागुंतीच्या भूमितीचा प्रवास .

इमेज
मराठी रंगभूमीवर आशयघन नाटकांची परंपरा जपणाऱ्या नाटकांमध्ये आता आणखी एका वेगळ्या कलाकृतीची भर पडणार आहे. ‘काटकोन त्रिकोण’ हे नाटक ऑगस्टमध्ये रंगभूमीवर दाखल होत असून, पोस्टरपासूनच या नाटकाने रसिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. ‘बुद्धी आणि भावना ह्यांना स्पर्श करणारं नाटक! ’ या एका ओळीतील ओळखच या नाटकाच्या गाभ्याची उत्सुकता वाढवणारी ठरते. सर्वसामान्य वाटणाऱ्या एका कुटुंबाच्या आयुष्यात घडणारी एक घटना आणि त्यानंतर बदलत जाणारी नात्यांची समीकरणं. प्रत्येक उत्तरासोबत उभे राहाणारे नवे प्रश्न, मनात दडवून ठेवलेली सत्यं आणि भावनांच्या गुंतागुंतीत अडकलेली माणसं… ‘काटकोन त्रिकोण’ नेमकं काय उलगडणार, याची उत्सुकता मात्र शेवटपर्यंत कायम ठेवणार आहे.    या नाटकात शरद पोंक्षे, सुयश टिळक आणि प्रियांका तेंडोलकर या तीन दमदार कलाकारांच्या भूमिका असून, त्यांच्या व्यक्तिरेखांमधून आधुनिक नातेसंबंधातील अनेक छटा उलगडणार आहेत.    दिग्दर्शक अजित भुरे म्हणाले, ‘’ ‘काटकोन त्रिकोण’ हा कौटुंबिक थ्रिलर असून प्रत्येक कुटुंबात काही न बोललेले प्रश्न, काही दडवलेली सत्यं आणि काही नाती...