पोस्ट्स

समर्थ रामदास स्वामींच्या कर्मभूमीत ‘बंध विमोचन राम’ गाण्याचे भावपूर्ण अनावरण.

इमेज
गुरुपौर्णिमा… गुरुंच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक होण्याचा दिवस! समर्थ रामदास स्वामींच्या विचारांनी अनेक पिढ्यांना जीवनाची दिशा दिली. त्याच समर्थ विचारांचा जागर करणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘बंध विमोचन राम’ या भक्तिरसपूर्ण गीताचे गुरुपौर्णिमेच्या मंगल मुहूर्तावर समर्थ रामदास स्वामींच्या कर्मभूमी आणि समाधिस्थान असलेल्या सज्जनगडावर भक्तिमय वातावरणात अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, या गीताचे चित्रीकरणही याच पवित्र भूमीत झाले असल्याने हा सोहळा अधिकच भावपूर्ण ठरला. समर्थांच्या स्मृतींनी भारावलेल्या सज्जनगडावर चित्रपटाच्या संपूर्ण टीमने उपस्थित राहून गीताचे अनावरण केले. गुरुपौर्णिमेचे औचित्य, सज्जनगडाचे पावित्र्य आणि समर्थांच्या चरणी कृतज्ञतेचा भाव यामुळे हा क्षण केवळ एका गाण्याच्या अनावरणापुरता मर्यादित न राहता समर्थ विचारांना अभिवादन करणारा एक सांस्कृतिक सोहळाच ठरला. ‘बंध विमोचन राम’ हे भक्तिगीत समर्थ रामदास स्वामींच्या परमशिष्या संत वेण्णास्वामी यांनी रचलेले असून, त्यांची समाधीही सज्जनगडावरील समर्थांच्या समाधीच्या समीप आहे. गुरु-शिष्य परंपरेचे मूर्तिमंत उदाहरण ठ...

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जोडीचा नवा चित्रपट 'मूर्ती'.

इमेज
कला जेव्हा समाजाचे वास्तव प्रतिबिंबित करते, तेव्हा ती केवळ मनोरंजनाचे माध्यम राहत नाही, तर विचारप्रवर्तक ताकद बनते. अशाच आशयप्रधान आणि सामाजिक भान जपणाऱ्या चित्रपटांची परंपरा पुढे नेत, राष्ट्रीय पुरस्कार विजेती जोडी निर्माते अमोल कागणे आणि दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एका वेगळ्या आणि विचारप्रवर्तक मराठी चित्रपटासह येत आहे. ‘हलाल' आणि 'भोंगा' सारख्या राष्ट्रीय पुरस्करांनी गौरविलेल्या चित्रपटांनंतर त्यांच्या महत्त्वाकांक्षी निर्मितीतील 'मूर्ती' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समाजातील ज्वलंत प्रश्नांना संवेदनशीलपणे मांडत, प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवण्याची हातोटी दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील यांनी यापूर्वी सिद्ध केली आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये केवळ मनोरंजन नसून सामाजिक भान, वास्तवाची जाणीव आणि विचारांना चालना देणारा आशय असतो. त्यामुळेच पहिल्याच चित्रपटातून राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या शिवाजी लोटण पाटील यांच्या प्रत्येक नव्या चित्रपटाकडे प्रेक्षक आणि चित्रपटसृष्टीचे विशेष लक्ष असते.'मूर्ती...

गोव्याच्या सफरीला साऊथचा तडका!‘मामाच्या गोव्याला जाऊया’ मधील ‘वणक्कम’ प्रेक्षकांच्या भेटीला...

इमेज
‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या आगामी मराठी चित्रपटाने आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या गाण्यांमधून प्रेक्षकांना गोव्याच्या धमाल सफरीची झलक दाखवली आहे. आता या चित्रपटातील आणखी एक भन्नाट प्रमोशनल गाणं ‘वणक्कम’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, त्याच्या हटके साऊथ इंडियन स्टाईलमुळे हे गाणं विशेष चर्चेत आलं आहे. ‘वणक्कम’ या गाण्यात साऊथ इंडियन संगीताची लय, रंगतदार बीट्स आणि धमाल व्हाइब अनुभवायला मिळतात. गाण्याची ऊर्जा, आकर्षक सादरीकरण आणि मनोरंजक कोरिओग्राफीमुळे हे गाणं प्रेक्षकांना ठेका धरायला लावणारे आहे. गोव्याच्या धमाल वातावरणात साऊथ इंडियन तडका देणारं हे गाणं चित्रपटाच्या मजेशीर आणि भन्नाट प्रवासाची आणखी एक झलक दाखवते.    मराठी चित्रपटात साऊथ इंडियन स्टाईलचा असा हटके प्रयोग प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अनुभव ठरणार असून, सोशल मीडियावरही या गाण्याची चांगली चर्चा सुरू आहे. या गाण्याला अवधूत गुप्ते व राहुल देशपांडे यांचा जबरदस्त आवाज लाभला आहे. तसेच अवधूत गुप्ते यांनीच या गाण्याचे शब्द लिहले असून त्यांचेच संगीत या गाण्याला लाभले आहे. त्यांच्या संगीताने या गाण्याला एक वेगळीच उर्जा ...

'बंधिनी' चित्रपटातून साकारणार स्त्री भावविश्वाची कहाणी.

इमेज
मराठी चित्रपटांत स्त्री विषयक समस्यांचा मागोवा घेणाऱ्या उत्तमोत्तम चित्रपटांची मोठी परंपरा आहे. हीच परंपरा पुढे नेणारा 'बंधिनी' हा चित्रपट येत्या ९ ऑक्टोबरला आपल्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा संपन्न झाला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.      सत्या फिल्म्स कंपनी निर्मित, सतीश वाघेला लिखित आणि संतोष मांजरीकर दिग्दर्शित 'बंधिनी' हा चित्रपट एका स्त्रीच्या भावनिक प्रवासाची कथा मांडतो. देविका या मध्यवर्ती पात्राभोवती फिरणारी ही कथा प्रेम, त्याग, कर्तव्य, कुटुंब आणि स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधाचा संवेदनशील वेध घेते. 'बंधिनी' ही केवळ एका स्त्रीच्या संघर्षाची कथा नसून, प्रत्येक नात्यामधील प्रेम, त्याग आणि आत्मसन्मानाचा अर्थ नव्याने उलगडणारी भावनिक सफर आहे. चित्रपटात अश्विनी बागल, भूषण शिवतरे आणि योगेश तनपुरे यांच्या प्रमुख भूमिका असून, त्यांच्या प्रभावी अभिनयातून ही कथा अधिक सशक्तपणे उलगडणार आहे.    चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष मांजरीकर म्हणाले, "आजच्या काळात प्रत्येक स्त्री स्वतःची स्वप्नं आणि कुटुंबाची ज...

‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ रंगभूमीवर उलगडणार विठ्ठलभक्ती,श्रद्धा आणि आत्मशोधाचा प्रवास.

इमेज
आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने एका नव्या आणि आशयघन नाटकाची घोषणा करण्यात आली आहे. ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, श्रद्धा, अध्यात्म आणि जीवनप्रवास यांचा वेध घेणारी ही कलाकृती असल्याची उत्सुकता पहिल्या पोस्टरमधूनच निर्माण झाली आहे.      ‘पंढरीची वाट संपत नाही… ती प्रत्येक पावलागणिक नव्याने सुरू होते.’ या आशयपूर्ण ओळींसह प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये एका प्रवाशाचा पंढरीच्या दिशेने सुरू असलेला प्रवास आणि विठ्ठलाच्या विराट रूपाचे प्रतीकात्मक दर्शन घडते. त्यामुळे हे नाटक केवळ पंढरपूरच्या वारीपुरते मर्यादित न राहाता, प्रत्येकाच्या अंतर्मनातील श्रद्धा, संघर्ष आणि आत्मशोधाचा प्रवास मांडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.    या नाटकाचे दिग्दर्शन अशुतोष पोपट जरे यांनी केले असून निर्मिती डॉ.उमेश आजगावकर,नितीन प्रकाश वैद्य, सचिन सुभाष अवस्थी, स्वाती दिवे मुखर्जी यांनी केली आहे. कथानक, सादरीकरण आणि भावविश्व यांचा सुरेख मेळ साधत हे नाटक प्रेक्षकांना एक वेगळा नाट्यअनुभव देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दिग्दर्शक ...

अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री पूजा सावंत ही जोडी पुन्हा एकत्र.

इमेज
तरुणाईच्या पसंतीस उतरलेला "भेटली तू पुन्हा" हा चित्रपट २८ जुलै २०१७ रोजी  प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला ९ वर्ष पूर्ण झाली असून याच विशेष दिवसाचे औचित्य साधून निर्मात्यांनी चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा नुकतीच सोशल मीडियावर केली आहे. "भेटली तू पुन्हा 2" लव स्टोरीच्या पुढची स्टोरी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या डिसेंबर महिन्यात सुरुवात होणार असून अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री पूजा सावंत ही जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येणार आहे. स्वरूप स्टुडिओज या चित्रपटाची निर्मिती करणार असून प्रभाकर परब, सचिन नारकर आणि विकास पवार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. "भेटली तू पुन्हा" या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे हे  या चित्रपटाच्या सिक्वलचे दिग्दर्शन करणार असून लेखन संजय जमखंडी यांचे आहे."भेटली तू पुन्हा" या चित्रपटाचा सिक्वल येतो आहे हे माझ्यासाठी खरंच आनंदाची बाब आहे. हलकी फुलकी प्रेमकथा, सुमधुर संगीत, उत्तम अभिनय यामुळे रसिक प्रेक्षकांचा चित्रपटाच्या पहिल्या भागाला छान प्रतिसाद मिळाला होता. आता या चित...

निसर्गाच्या सान्निध्यात रंगणार मराठी कलाकारांची ‘झिम्माड’ पावसाळी पिकनिक.

इमेज
पावसाच्या सरींनी राज्यभरातील वातावरण प्रसन्न केलं असून, सर्वत्र हिरवाईची चादर पसरली आहे. अशा आल्हाददायक वातावरणात मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारही पावसाळ्याचा आनंद एका वेगळ्याच अंदाजात साजरा करणार आहेत. अभिनेता-दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री याने ‘झिम्माड’ या खास पावसाळी पिकनिकचे आयोजन केले असून, पुण्याजवळील मॅरीगोल्ड बॅन्क्वेट्सच्या ‘डी लश’ या आलिशान ठिकाणी हा मैत्रीसोहळा रंगणार आहे. निसर्गाच्या सान्निध्यात नाच-गाणी, धमाल खेळ, गप्पा, स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि भरपूर मस्तीचा रंगतदार मेळा यावेळी अनुभवायला मिळणार आहे.     पाऊस म्हटलं की प्रत्येकाच्या मनात काही ना काही सुंदर आठवणी जाग्या होतात. शाळा-कॉलेजच्या दिवसांतील मित्रमैत्रिणींसोबतच्या पावसाळी सहली, धम्माल आणि अविस्मरणीय क्षण आजही प्रत्येकाच्या स्मरणात असतात. मात्र, कामाच्या वाढत्या व्यापामुळे अशा निवांत भेटी आता दुर्मिळ झाल्या आहेत. हाच धागा पकडत पुष्कर श्रोत्रीने मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना एकत्र यायचं आवाहन केलं आणि त्याच्या आवाहनाला ६० हून अधिक कलावंतांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पुन्हा एकदा पावसाळ्याचा आनंद ...