पोस्ट्स

दानशूर आदरणीय भागोजी शेठ कीर स्मारक लोकार्पण ...

इमेज
    आज नररत्नांच्या आमच्या रत्नागिरी शहराच्या वेशीवर साळवी स्टॉपच्या परिसरात दानशूर आदरणीय श्रीमंत भागोजी शेठ कीर यांच्या पवित्र स्मारकाचा लोकार्पण समारंभ सायंकाळी संपन्न होत आहे. राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री यांच्या पुढाकारातून आणि त्यांच्या सामाजिक वरदहस्त दूरदृष्टीतून हे स्मारक उभे राहत आहे ही घटना इतिहासातील सुवर्णपान आहे. म्हणूनच मा. उदयजी सामंत आपले हार्दिक अभिनंदन! रत्नागिरी शहराच्या प्रारंभ वेशीवर काही वर्षांपूर्वी ‘स्वर्गीय भागोजीशेठ कीर प्रवेशद्वार’ ही सर्वांचे लक्ष वेधून घेणारी कमानसुद्धा पालकमंत्र्यांच्याच समाजदखल दृष्टीकोनातून उभी राहिली. या पवित्र स्मारकातून रत्नागिरी आणि महाराष्ट्रातल्या भविष्यातील पिढ्या नवा संदेश, नवी प्रेरणा घेतील. यातूनच परस्परांतील सामाजिक मैत्री आणि ऋणानुबंध वाढीला लागतील, अशी आपण खात्री बाळगूया. राष्ट्रपुरुषांच्या समाज शिल्पकारांच्या स्मारकांचा अभिमान बाळगताना त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा चालवण्याची जबाबदारी ही तुम्हा-आम्हा सर्वांची आहे. दानशूर भागोजीशेठ कीर यांचे कार्य हे केवळ भंडारी ज्ञा...

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांनी अनुभवली 'गोरेगाव चित्रनगरी'.

इमेज
    गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत (फिल्मसिटी) येथे गुरुवारी यवतमाळ येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलांनी भेट दिली. या महिलांना संपूर्ण चित्रनगरी फिरण्याची संधी मिळाली. आता पर्यंत दूरदर्शनच्या पडद्यावर ज्या मालिका, चित्रपट पाहिल्या त्याचे चित्रीकरण प्रत्यक्ष पाहताना महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. या महिलांचे चित्रनगरीचे सह-व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी स्वागत केले.  यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे 'रसिकाश्रय' संस्था ही गेले २५ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने दरवर्षी 'जीवाची मुंबई' हा आगळा वेगळा उपक्रम राबविला जातो. यावर्षी या उपक्रमाच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्याच्या दुर्गम भागातील  पतीच्या निधनानंतर शेती आणि घराची जबाबदारी पेलणाऱ्या महिलांना मुंबईतील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीची सफर घडवून आणण्यात आली.     आजवर ज्या मालिका आणि चित्रपट केवळ दूरदर्शनच्या पडद्यावर पाहिले होते, त्याचे प्रत्यक्ष चित्रीकरण कसे चालते, भव्य सेट कसे असतात आणि कलाकार प्रत्यक्षात कसे दि...

‘माया’च्या कथेला नवी उंची देणारे ‘मन गाईना सुरात’ गाणे प्रदर्शित.

इमेज
‘माया’ या चित्रपटातील ‘मन गाईना सुरात’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून, ते संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहाण्याचा संदेश देणारे हे गाणे ऐकताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते.     ‘मन गाईना सुरात’ ह्या गाण्याचे सुंदर शब्द आणि सुरेल धून यामुळे हे गाणे प्रेक्षकांना भावत आहे. या गाण्यातील दृश्यांमध्येही प्रकाश, रंग आणि हसरे क्षण यांची सुंदर सांगड घालत प्रसन्न वातावरण निर्माण करण्यात आले आहे. या गाण्याला अंजली मराठे हिचा सुरेल आवाज लाभला असून वैभव जोशी यांचे शब्द लाभले आहेत. तसेच पार्थ उमराणी यांचे भावपूर्ण संगीत या गाण्यात अधिकच रंगत आणते.     दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, “ ‘मन गाईना सुरात’ हे आमच्या चित्रपटातील खूप खास गाणे आहे. मनाचे विविध विभ्रम, संभ्रम दाखवणारे हे गाणे चित्रपटातील अव्यक्त भावना सुरेलपणे व्यक्त करते."    निर्माते नितीन वैद्य म्हणतात, “ ‘माया’मधील ‘मन गाईना सुरात’ प्रेक्षकांना सकारात्मक ऊर्जा देईल. कथानकाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर येणारे हे गाणे चित्रपटाचा चित्रपटाच्या कथेला आकार देते. साधे,...

"ट्रायंगल"मराठीतील पहिला स्पाय थ्रिलर चित्रपट.

इमेज
    हिंदी किंवा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आजवर अनेक स्पाय थ्रिलर चित्रपट झाले आहेत. मात्र, मराठी चित्रपटात असलेली स्पाय थ्रिलर चित्रपटांची उणीव आता भरून निघणार आहे. "ट्रायंगल" हा मराठी चित्रपटसृष्टीतला पहिला स्पाय थ्रिलर चित्रपट ठरणार असून, अर्जून करे हा नवा चेहरा या चित्रपटातूुन प्रेक्षकांसमोर येणार आहे. देशभक्ती, निष्ठा आणि धाडसाची अनोखी गोष्ट या निमित्ताने मराठी भाषेतून मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.  वैष्णवी फिल्म्सची निर्मिती असलेल्या "ट्रायंगल" या चित्रपटाची निर्मिती विकी सूर्यवंशी आणि सुखदेव आढाव यांनी केली असून लेखन आणि दिग्दर्शन विकी सूर्यवंशी यांनी केलं आहे. राजकीय आणि गुप्तधार्मिक जगतातील गुंतागुंत या चित्रपटात मांडण्यात आली आहे. भारताच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली इंडियन ओशन सिक्युरिटी सिस्टिम डॉक्युमेंट्स चोरी करण्याचा प्रयत्न परदेशी संस्था करतात आणि सुरू होतो एक आंतरराष्ट्रीय खेळ... वेगवान कथा, उत्कृष्ट अॅक्शन सिक्वेन्स हे चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. तांत्रिक बाजूंव...

शिवजयंतीच्या उत्साहात ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’चे अर्धशतक साजरेदुहेरी जल्लोषात रंगला सोहळा.

इमेज
   मराठी माध्यम शाळेच्या अस्मितेला ठाम आवाज देणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २७ कोटींहून अधिक कमाई करत अभिमानास्पद यश संपादन केले असून, या चित्रपटाने चित्रपटगृहात अभिमानाने ५० यशस्वी दिवस पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या टीमने हा अर्धशतकाचा आनंद साजरा करतानाच शिवजयंतीही मोठ्या उत्साहात साजरी केली आणि त्यामुळे हा सोहळा अक्षरशः दुहेरी जल्लोषात रंगला.    मुंबईतील एका चित्रपटगृहात हा सोहळा मोठ्या दणक्यात, जल्लोषात आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर साकारलेल्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले होते. घोड्यावरून ‘बालशिवरायां’चे आगमन होताच उपस्थितांमध्ये उत्साहाची प्रचंड लाट उसळली. तर शिवगर्जना ऐकताना प्रेक्षक स्तब्ध झाले, पुढच्याच क्षणी टाळ्यांचा कडकडाट झाला. घोषणांचा नाद, मराठी अस्मितेचा अभिमान आणि जल्लोषमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी चित्रपटाच्या टीमने छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देत हा विशेष सोहळा विद्यार्थी आणि प्रेक्षकांसोबत साजरा...

‘Rx 2025–26 तरंग’ : फार्मसी विद्यार्थ्यांचा त्रिदिवसीय महोत्सव येत्या २८ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ दरम्यान बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, कालिना (मुंबई) येथे.

इमेज
इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन – महाराष्ट्र राज्य शाखा स्टुडंट्स’ फोरम (IPA–MSB–SF) तर्फे आयोजित करण्यात येणारा राज्यातील सर्वात जुना व प्रतिष्ठित फार्मसी महोत्सव Rx 2025–26 यंदा नव्या संकल्पनेसोबत उत्साहात साजरा होणार आहे. महाराष्ट्रभरातील फार्मसी विद्यार्थ्यांचे अधिकृत राज्यस्तरीय प्रतिनिधित्व करणारी ही विद्यार्थी संघटना शैक्षणिक उत्कृष्टता, व्यावसायिक प्रगती आणि सामाजिक जबाबदारीची परंपरा या महोत्सवाद्वारे पुढे नेत आहे. हा त्रिदिवसीय महोत्सव २८ फेब्रुवारी, १ मार्च आणि २ मार्च २०२६ रोजी बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, कालिना (मुंबई) येथे आयोजित करण्यात येणार आहे. यंदाच्या आवृत्तीची थीम आहे — “आरएक्स तरंग – Rx Tarang”. नवोन्मेष, सर्जनशीलता आणि सामूहिक ऊर्जेच्या लहरींचे प्रतीक असलेली ही संकल्पना सतत विकसित होत असलेल्या फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या गतिमान वृत्तीचे प्रतिनिधित्व करते. शिक्षण, नेतृत्व, संशोधन आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती यांचा अखंड प्रवाह या ‘तरंग’मधून अनुभवता येणार आहे.    गेल्या अनेक वर्षांत या महोत्सवाने सुमारे ४,००० ते ५,००० फार्मसी विद्यार्थी, प्राध...

प्रतिष्ठेचा ‘इंका अवॉर्ड्स’ १५ व १६ एप्रिल रोजी मुंबईत.

इमेज
इंडियन नॅशनल सिने अकॅडमी अवॉर्ड्स (INCA Awards) यांच्या पहिल्या पर्वाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, हा भव्य सोहळा १५ आणि १६ एप्रिल रोजी मुंबईत संपन्न होणार आहे.भारतामधील १२ प्रमुख चित्रपट उद्योगांना एका समान व्यासपीठावर आणणारा ‘इंका’ हा देशातील पहिला राष्ट्रीय चित्रपट अकॅडमी मंच आहे. भाषाभेद, प्रांतिक सीमारेषेच्या चौकटी ओलांडून, भारतीय सिनेमाची व्यापकता, वैविध्य आणि जागतिक स्तरावरील महत्त्व यांचा एकत्रित व समतोल सन्मान करण्याचा हा दूरदृष्टीपूर्ण स्तुत्य उपक्रम आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सांस्कृतिक एकात्मतेला संस्थात्मक स्वरूप देणारा हा उपक्रम अतिशय महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.   ‘इंका’ची संकल्पना सेलिब्रिटी क्रिकेट लीग (CCL) आणि साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स (SIIMA) संबंधित उपक्रमांचे संस्थापक व मार्गदर्शक यांच्या संकल्पनेतून साकारली असून, या उपक्रमाचे नेतृत्व विष्णू वर्धन इंदुरी करत आहेत. प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया (Producers Guild of India) हे या उपक्रमाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे ‘इंका’ला संस्थात्मक विश्वासार्हता, व्यापक दृष्टी आणि जागति...