पोस्ट्स

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय.

इमेज
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने एकहाती विजय मिळवत वर्चस्व कायम राखले आहे. थेट निवडणुकीसाठी झालेल्या १४ जागांपैकी सर्व १४ जागांवर समर्थ पॅनेलचे उमेदवार विजयी झाले, तर विरोधी चित्रकर्मी पॅनेलला एकही जागा मिळवता आली नाही. महामंडळाच्या एकूण १७ जागांपैकी तीन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित १४ जागांसाठी झालेल्या मतदानात सभासदांनी समर्थ पॅनेलच्या बाजूने स्पष्ट कौल दिला. समर्थ पॅनेलचे विजयी उमेदवार. निर्माता विभागातून मेघराज राजेभोसले (९५१ मते) आणि सुनील महाजन (७८६ मते) विजयी झाले. दिग्दर्शक विभागातून दीपक कदम (८४६ मते) आणि अजित शिरोळे (७५६ मते) यांनी विजय मिळवला. लेखक विभागातून राज काजी (८५० मते), अभिनेता विभागातून सुशांत शेलार (८९१ मते), छायाचित्रण विभागातून धनाजी यमकर (९५२ मते) , नृत्य दिग्दर्शन विभागातून सुभाष नकाशे (८९२ मते), ध्वनिमुद्रण विभागातून शरद चव्हाण (९७५ मते), कला दिग्दर्शन विभागातून प्रवीण पाटील (८८५ मते), रंगभूषा विभागातून चैत्र...

मराठी नववर्षाची सुरुवात होणार गोड! ‘साखर खाल्लेला माणूस’ ७ एप्रिल २०२७ येणार प्रेक्षकांच्या भेटीला.

इमेज
अंगणात उभारलेली गुढी, कौलारू घर, सभोवतालचा निसर्ग आणि नात्यांच्या गोडव्याची चाहूल देणारं वातावरण… अशा आकर्षक पोस्टरसह नव्या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. ‘साखर खाल्लेला माणूस’ हा कौटुंबिक चित्रपट नवीन वर्षात म्हणजेच ७ एप्रिल २०२७ रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची संहिता पुण्यातील दगडू शेठ गणपतीच्या चरणी ठेवून बाप्पाचे आशीर्वाद घेऊन  चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात झाली आहे.  पोस्टरवरूनच हा चित्रपट कुटुंब, नाती आणि माणुसकीच्या गोडव्याभोवती फिरणार असल्याचा अंदाज येतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात कुटुंबाला एकत्र आणणारी, हसवणारी आणि भावूक करणारी कथा या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात समीर चौघुले, सोनाली कुलकर्णी, नयना आपटे, अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री आणि नील सालेकर यांसारखे लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. विविध पिढ्यांतील कलाकारांची ही दमदार फळी चित्रपटात विशेष रंगत आणणार आहे.     एबीसी क्रिएशन आणि नितीन वैद्य प्रॅाडक्शन्स निर्मिती या चित्रपटाचे निर...

मराठी विश्वातील अजरामर साहित्यकृती 'गारंबीचा बापू’ आता रुपेरी पडद्यावर.

इमेज
साहित्यकर्मी, कादंबरीकार श्री. ना. पेंडसे लिखित मराठी रंगभूमी आणि साहित्यविश्वात रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अत्यंत लोकप्रिय कलाकृती आता मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. मराठी रंगभूमी आणि साहित्यविश्वात रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले, अत्यंत गाजलेले आणि प्रेक्षकांचे लाडके नाटक 'गारंबीचा बापू' आता एका चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार असून ‘निर्णय’, ‘हिरकणी’ ( बाबासाहेब पुरंदरे लिखित ), ‘योद्धा’ यांसारखे दर्जेदार मराठी चित्रपट तसेच अमेझॅान प्राईमवरील ‘मिसेस अॅण्ड मिस्टर खुराना’ वेबसीरिजचे दिग्दर्शक गुरुप्रसाद इनामदार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. गुरूप्रसाद फिल्म्स प्रस्तुत 'गारंबीचा बापू - गोष्ट एका वाघाची ' या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून या घोषणेमुळे सिनेसृष्टी आणि प्रेक्षकांसह साहित्य वर्तुळातही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यापूर्वीही या विषयावर नाटक येऊन गेले असले तरीही नव्या काळाचे प्रगत तंत्रज्ञान आणि एका वेगळ्या भव्य दृष्टिकोनाचा मिलाफ साधत ही अजरामर कथा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर जिवंत होण...

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद.

इमेज
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक आज, रविवार दि. ७ जून ला मुंबईत सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. मुंबई सोबत पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर या विभागांत हे मतदान झाले असून महामंडळाच्या ३४०३ मतदारांपैकी १६९८ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. सरासरी ४९.९० टक्के मतदानाची नोंद झाली.  सभासदांनी दिलेला हा प्रतिसाद उल्लेखनीय ठरला असून चित्रपट महामंडळाविषयी असलेला विश्वास आणि बांधिलकी अधोरेखित करणारा असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यंदाच्या निवडणुकीत समर्थ पॅनल आणि चित्रकर्मी पॅनल यांच्यात चुरशीची लढत पहायला मिळाली. मुंबईत मतदानासाठी उपस्थित असलेल्या कलाकारांमध्ये किशोरी शहाणे, जयवंत वाडकर, सोनाली खरे, केदार शिंदे, निलम शिर्के-सामंत, प्रसाद ओक, स्वप्निल जोशी, विजय गोखले, संजय जाधव, प्रिया बेर्डे, पुष्कर श्रोत्री, अभिजीत पानसे, संदीप पाठक, उषा नाईक, शरद पोंक्षे, प्रदीप वेलणकर, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, विद्याधर पाठारे, प्रशांत दळवी, मेघा घाडगे, सादिक चितळीकर, विशाखा सुभेदार, राजू पार्सेकर, ऋषी देश...

विक्रम गोखले अभिनित शेवटची कलाकृती "बेवारस - सत्य एका वळणावरचं" .

इमेज
मराठी रंगभूमी, मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते, दिवंगत विक्रम गोखले यांचा अखेरचा चित्रपट असलेल्या "बेवारस - सत्य एका वळणावरचं" या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. अतिशय हृदयस्पर्शी कथानक, उत्तम स्टारकास्ट टीजरमध्ये दिसत आहे.२५ जून रोजी हा चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. हरिणी प्रॉडक्शन्स निर्मित "बेवारस - सत्य एका वळणावरचं" या चित्रपटाची प्रस्तुती शिव आर्यन फिल्म्सनं केली आहे. या चित्रपटाची निर्मिती सौ.रिया कुमार, नितीन विचारे व शिव आर्यन यांची आहे, कथा विजय राणे आणि दिग्दर्शन विजय राणे व सौ. रिया कुमार यांचे आहे. क्रिएटिव्ह दिग्दर्शन नितीन विचारे, शिरीष लाटकर यांची पटकथा, संवाद लेखन, गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन विवेक आपटे, शिर्षक गीत लेखन सौ. रिया कुमार व संगीत बिपलाब दत्ता यांचे आहे. यूजीन डिसोझा आणि योगेश कोळी यांनी छायांकन, अमीर हडकर यांनी पार्श्वसंगीत, यश सुर्वे यांनी संकलन , स्टार कास्टिंग नितीन विचारे यांनी केलं आहे. चित्रपटात विक्रम गोखले यांच्यासह तेजस्विनी पंडित, रोहिणी हट्टंगडी, उषा नाईक, निहार गिते, ऋतुजा बागव...

दोन इरसाल मित्रांची 'पत्रापत्री' रसिकांच्या प्रेमामुळे गाठली शंभरी.

इमेज
मराठी सांस्कृतिक विश्वात गेल्या दोन वर्षांत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘पत्रापत्री’ या आगळ्यावेगळ्या साभिनय अभिवाचनाने आता १०० व्या प्रयोगाचा मानाचा टप्पा गाठला आहे. शब्दांची ताकद, भावनांची उब, दृकश्राव्य सादरीकरणाची देखणी साथ आणि दोन ज्येष्ठ कलावंतांची अप्रतिम जुगलबंदी यामुळे ‘पत्रापत्री’ने रसिकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या लेखणीतून जन्माला आलेल्या पत्रांच्या विश्वाला विजय केंकरे यांच्या कल्पक सादरीकरणाची जोड लाभली आणि त्यातून साकारला हा अनोखा प्रयोग. हे केवळ अभिवाचन नाही, तर शब्द, भावना आणि अभिनय यांचा सुरेख संगम असलेले साभिनय अभिवाचन आहे. दोन मित्रांमधील पत्रसंवादाच्या माध्यमातून उलगडणाऱ्या आठवणी, नात्यांतील जिव्हाळा, काळानुसार बदलणारे संदर्भ आणि मिश्किल विनोद यामुळे प्रत्येक प्रयोग रसिकांसाठी एक आत्मीय अनुभव ठरला आहे.    बदाम राजा प्रोडक्शन्स निर्मित आणि विजय केंकरे दिग्दर्शित पत्रापत्रीमध्ये एकूण पाच पत्रांचे अभिवाचन आहे. विशेष म्हणजे प्रत्येक प्रयोगात काही नवी पत्रे आणि नवे संदर्भ समावि...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘आऊट ऑफ सिल्याबस’ चित्रपटाच्या टीमकडून वृक्षारोपण.

इमेज
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आगामी मराठी चित्रपट ‘आऊट ऑफ सिल्याबस’च्या टीमने वृक्षारोपणाचा उपक्रम राबवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. चित्रपटातील कलाकार, निर्माते आणि संपूर्ण टीमने उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी टीमने विविध प्रकारची झाडे लावून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि वृक्षतोड यांसारख्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. वृक्षारोपणासोबतच ‘आऊट ऑफ सिलेबस’ चित्रपटाचे अनोख्या पद्धतीने प्रमोशनही करण्यात आले. पर्यावरणपूरक उपक्रमातून चित्रपटाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न टीमकडून करण्यात आला.  यावेळी चित्रपटाचे निर्माते डॉ. सुगत जी वाघमारे, लेखक अनिकेत रामचंद्र कोरडे, AI क्रिएटिव्ह डायरेक्टर सचिन मनोहरराव ढोकणे आणि अभिनेता अजिंक्य राऊत, अद्वयी, शेषपाल गनवीर, अभिजीत रामचंद्र ही कलाकारांची टीम उपस्थित होती. मॅक्सिस सिटी नवी मुंबई येथे हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. सामाजिक जाणीव आणि मनोरंजन यांचा ...