पोस्ट्स

‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ – विचार करायला भाग पाडणारी नाट्यकृती चर्चेत.

इमेज
‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ या शीर्षकाने सादर झालेल्या नव्या नाट्यकृतीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. प्रत्येक मराठी आणि महाराष्ट्रप्रेमी व्यक्तीच्या भावनांशी थेट नातं जोडणारा विषय या नाटकात प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.   संस्कृती कला प्रतिष्ठान आणि लोकजागर नाट्य संस्था निर्मित या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन संदिप जंगम यांनी केले आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील विविध घटनांचा आढावा घेत, या कलाकृतीतून त्या काळातील संघर्ष, बलिदान आणि मराठी अस्मितेचा अभिमान उलगडला जातो.   नाटक पाहताना कधी पूर्वजांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतो, तर कधी महाराष्ट्र आणि मुंबईसाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीरांच्या कथा डोळे पाणावून टाकतात. त्याचबरोबर आजच्या महाराष्ट्राची आणि विशेषतः मुंबईतील मराठी माणसाच्या स्थानाची वास्तव स्थितीही या नाटकातून अधोरेखित केली जाते.    गावागावातून मुंबईत आलेल्या मराठी माणसांच्या कष्टावर उभी राहिलेली ही नगरी आज बदलत चालली आहे. “मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची” असा ठाम आवाज देणाऱ्या मराठी जनतेच्या पार्श्वभूमीवर आजच्या परिस्थितीवर प्रश...

शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा जागर.

इमेज
चैत्र महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीला हिंदू संस्कृतीत विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा, या दिवशी या नवरात्रोत्सवाची मंगलमय सुरुवात होते. या पवित्र उत्सवाचा जागर करण्यासाठी शेलार मामा फाऊंडेशनने पुढाकार घेतला असून, अभिनेता सुशांत शेलार आणि पत्नी सौ. साक्षी सुशांत शेलार यांच्या विद्यमाने लोअर परेल येथे  १९ मार्चपासून  ते २७ मार्च  या कालावधीत  ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होतोय.       माननीय उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने आणि खासदार मा. श्री. श्रीकांतजी एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेलारमामा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. सुशांत अरुण शेलार यांच्या संकल्पनेतून हा चैत्र नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मा.श्री. एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री - महाराष्ट्र राज्य), मा.श्री. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री -महाराष्ट्र राज्य), श्रीमती. सुनेत्रा पवार (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य), मा.डॉ.निलम गो-हे (उपसभापती- वि...

हेमंत ढोमे यांच्या वाढदिवसानिमित्ताने 'झिम्मा ३' च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर.

इमेज
महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोहोलेला, मैत्रीचा जल्लोष रंगवणारा आणि प्रत्येकाला 'आपलीच गोष्ट' वाटणारा ‘झिम्मा’चा प्रवास आता नव्या वळणावर येतोय… आणि या वेळी गोंधळ जरा जास्तच दिसतोय!  मैत्री, नात्यांचा भावनिक स्पर्श आणि धमाल ट्रिप यांचं भन्नाट मिश्रण सादर करणाऱ्या 'झिम्मा' आणि 'झिम्मा २'ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवलं. थिएटरमध्ये 'हाऊसफुल्ल'चे बोर्ड, सोशल मीडियावर चर्चा आणि बुकमायशोवर ट्रेंडिंग या सगळ्यामुळे 'झिम्मा' हा फक्त चित्रपतटापुरता मर्यादित न राहाता एक अविस्मरणीय प्रवासाचा अनुभव बनला. आणि आता… त्या अनुभवाचा तिसरा भाग अधिकृतपणे समोर आला आहे! दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या वाढदिवसानिमित्त 'झिम्मा ३'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून, त्याने सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडवली आहे. पुढील वर्षी म्हणजेच १ जानेवारी २०२७ मध्ये 'झिम्मा ३' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘क्रांतीज्योती विद्यालय - मराठी माध्यम’च्या जल्लोषमय सोहळ्यात या चित्रपटाची घोषणा झाली होती आणि आता पोस्टरमुळ...

फिटनेसच्या बाबतीत देवदत्त नागेचा रोल मॉडेल कुशल बद्रिके.

इमेज
मनोरंजनसृष्टीतील दमदार अभिनेता देवदत्त नागे आपल्या प्रभावी भूमिकांसोबतच त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. मात्र स्वतः फिटनेसकडे लक्ष देताना त्याला प्रेरणा मिळते ती त्याचा जिवलग मित्र, लोकप्रिय अभिनेता कुशल बद्रिके याच्याकडून. अभिनयासोबतच फिटनेसकडेही लक्ष देणाऱ्या या दोघा कलाकारांची मैत्री आणि एकमेकांना दिलेले प्रोत्साहन चाहत्यांमध्येही चर्चेचा विषय ठरत आहे.    मित्रांकडून मिळणारी प्रेरणा आयुष्याला नवी ऊर्जा देणारी ठरते. अभिनेता देवदत्त नागे यांच्यासाठी फिटनेसच्या बाबतीत कुशल बद्रिके खऱ्या अर्थाने ‘रोल मॉडेल’ असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी ‘घबाडकुंड’ चित्रपटाच्या फर्स्ट लूक लाँचच्या शानदार सोहळ्यात देवदत्त नागे यांनी हा खुलासा केला.चित्रीकरणादरम्यान सहकलाकारांसोबत घडलेल्या विविध आठवणींना उजाळा देताना त्यांनी सेटवरील धमाल, मस्ती आणि गमती-जमतींचा उल्लेख केला. पहाटे दिव्याच्या प्रकाशात कुशलसोबत केलेला व्यायाम, त्यानंतरचा फक्कड गुळाचा चहा आणि चमचमीत मॅगी या सगळ्या खास क्षणांची रंगतदार कहाणी सांगताना देवदत्तने कुशलला ‘माझा फिटनेस आयडॉल’ हा किताब देत त्याची फिरकी घेतली...

'चैत्र चाहूल २०२६' : ‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा भावपूर्ण सोहळा रवींद्र नाट्यमंदिरात संपन्न.

इमेज
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा हा सोहळा यावर्षी गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.   कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता वैभव मांगले यांच्या प्रभावी कथावाचनाने झाली. त्यांनी प्रख्यात लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या ‘माळ’ या गाजलेल्या कथेचे वाचन सादर केले. मानवी नातेसंबंध, एकटेपणा आणि भावनिक पोकळी यांचे सूक्ष्म दर्शन घडवणाऱ्या या कथेचे त्यांनी केलेले सादरीकरण इतके जिवंत होते की, सभागृहातील रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. ‘माळ’ ही केवळ ओसाड जागेची प्रतिमा नसून, मनातील रिकामेपणाचे प्रतीक आहे, हे त्यांनी आपल्या वाचनातून प्रभावीपणे उलगडले. मास्तर आणि काशीताई यांसारख्या व्यक्तिरेखा जणू रंगमंचावर सजीव झाल्याचा भास रसिकांना झाला. उपस्थितांनी या वाचनाला उत...

१०१ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते मा. श्री. मोहन जोशी यांची एकमताने निवड.

इमेज
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बुधवार दिनांक १८ मार्च २०२६ रोजी झालेल्या नियामक मंडळ सभेत नियोजित *१०१ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते मा. श्री. मोहन जोशी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच १०० व्या नाट्यमहोत्सवाची सांगता शुक्रवार दिनांक २४ एप्रिल ते रविवार २६ एप्रिल दरम्यान रत्नागिरी येथे होणार आहे.

केदार शिंदे - सना शिंदे घेऊन येत आहेत ‘आई भाड्याने हवी?’

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीत स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळी ओळख देणारे दिग्दर्शक केदार यशोधरा शिंदे आता आणखी एका वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या संकल्पनेसह प्रेक्षकांसमोर येत आहेत. ‘अगंबाई…अरेच्चा!’, ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता ‘आई भाड्याने हवी?’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.   सनफ्लॉवर स्टुडिओ निर्मित या चित्रपटाची कथा आणि लेखन वैशाली शशी नाईक आणि ओंकार वसुंधरा दत्त यांनी केले असून छायांकन व संकलनाची जबाबदारी मयुर संजिवनी हरदास यांनी सांभाळली आहे. विशेष म्हणजे ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’नंतर निर्माती सना शिंदे, दिग्दर्शक केदार शिंदे, लेखिका वैशाली शशी नाईक, लेखक ओंकार वसुंधरा दत्त ही चौकडी पुन्हा एकदा एकत्र येत असल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.दिग्दर्शक केदार शिंदे सांगतात, “स्त्रीप्रधान विषय हाताळणे ही नेहमीच जबाबदारीची आणि आव्हानात्मक गोष्ट असते. जोपर्यंत एखादी कथा मनापासून भिडत नाही, तोपर्यंत अशा चित्रपटाची सुरुवात करायची नाही, असा माझा ठाम निर्धार होता. ‘अ...