पोस्ट्स

अर्नाळ्यातील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिभावात संपन्न; मानवसेवेचा संदेश ठरला केंद्रस्थानी.

इमेज
 प्रभात कॉलनी, अर्नाळा येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहात संपन्न झाला. अभिषेक, महापूजा, आरती, नामस्मरण, दर्शन तसेच ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. सदानंदबुवा गोखले यांच्या प्रभावी कीर्तनाने परिसर भक्तिमय झाला. त्यांनी आपल्या कीर्तनातून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या विचारांचा, सदाचाराचा आणि मानवतेच्या संदेशाचा प्रभावी जागर केला. यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रगतीबरोबरच माणुसकी, करुणा आणि संवेदनशीलता जपणे हीच काळाची खरी गरज असल्याचा संदेश देण्यात आला. श्री स्वामी समर्थ महाराजांची शिकवण सत्य, सेवा, प्राणीमात्रावरील प्रेम आणि मानवकल्याणाचा मार्ग दाखवणारी असल्याचेही सांगण्यात आले.   स्थानिक परंपरेनुसार, सन १८०० च्या सुमारास श्री स्वामी समर्थ महाराजांनी अर्नाळा परिसरात वास्तव्य केले होते. त्याच दैवी प्रेरणेतून श्री विनायक गुळगुळे व सौ. नूतन गुळगुळे यांनी सन २०१५ मध्ये गजलक्ष्मी स्वरूप कमळासनाधिष्ठित श्री स्वामी समर्थ शक्तीस्थानाची स्थापना केली.    या शक्तीस्थानातील 'स्वानंद सेवा सदन' या उपक्रमाद्वारे ग्रामी...

यावेळी तिसराच आहे...... झिम्मा -३ च्या चित्रीकरणाला सुरुवात....

इमेज
‘झिम्मा’ आणि ‘झिम्मा २’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. त्यामुळे या मालिकेच्या तिसऱ्या भागाची घोषणा झाल्यापासूनच ‘झिम्मा ३’ची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता त्या उत्सुकतेत आणखी भर घालत चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली असून पोस्टरच्या माध्यमातून त्याची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे.  समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर साकारलेल्या या पोस्टरमध्ये काही जण एका वर्तुळात उभे असल्याचे दिसतेय. मात्र, कुणाचाही चेहरा दाखवलेला नाही. त्याऐवजी प्रत्येकाच्या हातात वेगवेगळे पेय दिसत आहे. कोणाच्या हातात कॉफी, कोणाकडे प्रोटीन शेक, कोणाकडे रंगीबेरंगी मॉकटेल, कोणाकडे नारळपाणी, तर कोणाच्या हातात आईस कॅन्डी आहे. प्रत्येकाची आवड आणि अंदाज वेगळा असल्याची झलक या पोस्टरमधून मिळते. एकाच फ्रेममध्ये दिसणारी ही रंगतदार मांडणी, समुद्रकिनाऱ्यावरील वातावरण आणि प्रत्येकाच्या हातातील वेगळेपण यामुळे यावेळीही प्रेक्षकांना धमाल, मस्ती आणि भरपूर मनोरंजन अनुभवायला मिळणार असल्याचे संकेत पोस्टर देत...

समर्थ रामदास स्वामींच्या कर्मभूमीत ‘बंध विमोचन राम’ गाण्याचे भावपूर्ण अनावरण.

इमेज
गुरुपौर्णिमा… गुरुंच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक होण्याचा दिवस! समर्थ रामदास स्वामींच्या विचारांनी अनेक पिढ्यांना जीवनाची दिशा दिली. त्याच समर्थ विचारांचा जागर करणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘बंध विमोचन राम’ या भक्तिरसपूर्ण गीताचे गुरुपौर्णिमेच्या मंगल मुहूर्तावर समर्थ रामदास स्वामींच्या कर्मभूमी आणि समाधिस्थान असलेल्या सज्जनगडावर भक्तिमय वातावरणात अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, या गीताचे चित्रीकरणही याच पवित्र भूमीत झाले असल्याने हा सोहळा अधिकच भावपूर्ण ठरला. समर्थांच्या स्मृतींनी भारावलेल्या सज्जनगडावर चित्रपटाच्या संपूर्ण टीमने उपस्थित राहून गीताचे अनावरण केले. गुरुपौर्णिमेचे औचित्य, सज्जनगडाचे पावित्र्य आणि समर्थांच्या चरणी कृतज्ञतेचा भाव यामुळे हा क्षण केवळ एका गाण्याच्या अनावरणापुरता मर्यादित न राहता समर्थ विचारांना अभिवादन करणारा एक सांस्कृतिक सोहळाच ठरला. ‘बंध विमोचन राम’ हे भक्तिगीत समर्थ रामदास स्वामींच्या परमशिष्या संत वेण्णास्वामी यांनी रचलेले असून, त्यांची समाधीही सज्जनगडावरील समर्थांच्या समाधीच्या समीप आहे. गुरु-शिष्य परंपरेचे मूर्तिमंत उदाहरण ठ...

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जोडीचा नवा चित्रपट 'मूर्ती'.

इमेज
कला जेव्हा समाजाचे वास्तव प्रतिबिंबित करते, तेव्हा ती केवळ मनोरंजनाचे माध्यम राहत नाही, तर विचारप्रवर्तक ताकद बनते. अशाच आशयप्रधान आणि सामाजिक भान जपणाऱ्या चित्रपटांची परंपरा पुढे नेत, राष्ट्रीय पुरस्कार विजेती जोडी निर्माते अमोल कागणे आणि दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एका वेगळ्या आणि विचारप्रवर्तक मराठी चित्रपटासह येत आहे. ‘हलाल' आणि 'भोंगा' सारख्या राष्ट्रीय पुरस्करांनी गौरविलेल्या चित्रपटांनंतर त्यांच्या महत्त्वाकांक्षी निर्मितीतील 'मूर्ती' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समाजातील ज्वलंत प्रश्नांना संवेदनशीलपणे मांडत, प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवण्याची हातोटी दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील यांनी यापूर्वी सिद्ध केली आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये केवळ मनोरंजन नसून सामाजिक भान, वास्तवाची जाणीव आणि विचारांना चालना देणारा आशय असतो. त्यामुळेच पहिल्याच चित्रपटातून राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या शिवाजी लोटण पाटील यांच्या प्रत्येक नव्या चित्रपटाकडे प्रेक्षक आणि चित्रपटसृष्टीचे विशेष लक्ष असते.'मूर्ती...

गोव्याच्या सफरीला साऊथचा तडका!‘मामाच्या गोव्याला जाऊया’ मधील ‘वणक्कम’ प्रेक्षकांच्या भेटीला...

इमेज
‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या आगामी मराठी चित्रपटाने आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या गाण्यांमधून प्रेक्षकांना गोव्याच्या धमाल सफरीची झलक दाखवली आहे. आता या चित्रपटातील आणखी एक भन्नाट प्रमोशनल गाणं ‘वणक्कम’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, त्याच्या हटके साऊथ इंडियन स्टाईलमुळे हे गाणं विशेष चर्चेत आलं आहे. ‘वणक्कम’ या गाण्यात साऊथ इंडियन संगीताची लय, रंगतदार बीट्स आणि धमाल व्हाइब अनुभवायला मिळतात. गाण्याची ऊर्जा, आकर्षक सादरीकरण आणि मनोरंजक कोरिओग्राफीमुळे हे गाणं प्रेक्षकांना ठेका धरायला लावणारे आहे. गोव्याच्या धमाल वातावरणात साऊथ इंडियन तडका देणारं हे गाणं चित्रपटाच्या मजेशीर आणि भन्नाट प्रवासाची आणखी एक झलक दाखवते.    मराठी चित्रपटात साऊथ इंडियन स्टाईलचा असा हटके प्रयोग प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अनुभव ठरणार असून, सोशल मीडियावरही या गाण्याची चांगली चर्चा सुरू आहे. या गाण्याला अवधूत गुप्ते व राहुल देशपांडे यांचा जबरदस्त आवाज लाभला आहे. तसेच अवधूत गुप्ते यांनीच या गाण्याचे शब्द लिहले असून त्यांचेच संगीत या गाण्याला लाभले आहे. त्यांच्या संगीताने या गाण्याला एक वेगळीच उर्जा ...

'बंधिनी' चित्रपटातून साकारणार स्त्री भावविश्वाची कहाणी.

इमेज
मराठी चित्रपटांत स्त्री विषयक समस्यांचा मागोवा घेणाऱ्या उत्तमोत्तम चित्रपटांची मोठी परंपरा आहे. हीच परंपरा पुढे नेणारा 'बंधिनी' हा चित्रपट येत्या ९ ऑक्टोबरला आपल्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा संपन्न झाला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.      सत्या फिल्म्स कंपनी निर्मित, सतीश वाघेला लिखित आणि संतोष मांजरीकर दिग्दर्शित 'बंधिनी' हा चित्रपट एका स्त्रीच्या भावनिक प्रवासाची कथा मांडतो. देविका या मध्यवर्ती पात्राभोवती फिरणारी ही कथा प्रेम, त्याग, कर्तव्य, कुटुंब आणि स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधाचा संवेदनशील वेध घेते. 'बंधिनी' ही केवळ एका स्त्रीच्या संघर्षाची कथा नसून, प्रत्येक नात्यामधील प्रेम, त्याग आणि आत्मसन्मानाचा अर्थ नव्याने उलगडणारी भावनिक सफर आहे. चित्रपटात अश्विनी बागल, भूषण शिवतरे आणि योगेश तनपुरे यांच्या प्रमुख भूमिका असून, त्यांच्या प्रभावी अभिनयातून ही कथा अधिक सशक्तपणे उलगडणार आहे.    चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष मांजरीकर म्हणाले, "आजच्या काळात प्रत्येक स्त्री स्वतःची स्वप्नं आणि कुटुंबाची ज...

‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ रंगभूमीवर उलगडणार विठ्ठलभक्ती,श्रद्धा आणि आत्मशोधाचा प्रवास.

इमेज
आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने एका नव्या आणि आशयघन नाटकाची घोषणा करण्यात आली आहे. ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, श्रद्धा, अध्यात्म आणि जीवनप्रवास यांचा वेध घेणारी ही कलाकृती असल्याची उत्सुकता पहिल्या पोस्टरमधूनच निर्माण झाली आहे.      ‘पंढरीची वाट संपत नाही… ती प्रत्येक पावलागणिक नव्याने सुरू होते.’ या आशयपूर्ण ओळींसह प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये एका प्रवाशाचा पंढरीच्या दिशेने सुरू असलेला प्रवास आणि विठ्ठलाच्या विराट रूपाचे प्रतीकात्मक दर्शन घडते. त्यामुळे हे नाटक केवळ पंढरपूरच्या वारीपुरते मर्यादित न राहाता, प्रत्येकाच्या अंतर्मनातील श्रद्धा, संघर्ष आणि आत्मशोधाचा प्रवास मांडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.    या नाटकाचे दिग्दर्शन अशुतोष पोपट जरे यांनी केले असून निर्मिती डॉ.उमेश आजगावकर,नितीन प्रकाश वैद्य, सचिन सुभाष अवस्थी, स्वाती दिवे मुखर्जी यांनी केली आहे. कथानक, सादरीकरण आणि भावविश्व यांचा सुरेख मेळ साधत हे नाटक प्रेक्षकांना एक वेगळा नाट्यअनुभव देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दिग्दर्शक ...