पोस्ट्स

‘घबाडकुंड’ मध्ये संदीप पाठक यांचा भन्नाट अंदाज....सोन्यासाठी विहिरीत उतरले.......

इमेज
    चाकोरीबाहेरील विषयांना प्राधान्य देत प्रभावी भूमिका साकारणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेता संदीप पाठक यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. विनोदीच नव्हे तर गंभीर धाटणीच्या भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारत त्यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी प्रेक्षकांना कायमच भुरळ घातली आहे.  आता मात्र प्रेक्षकांना संदीप पाठक यांचा एकदम वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. सोन्याच्या मोहात ते चक्क एका गूढ विहिरीत उतरले आहेत.  पण हे सोनं नेमकं काय आहे? आणि त्यामागचं रहस्य काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘घबाडकुंड’ या चित्रपटातून उलगडणार आहेत. संदीप पाठक यांच्या ‘दिल्या’ या व्यक्तिरेखेचा अचंबित  करणारा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये संदीप पाठक यांचा आजवर न पाहिलेला भन्नाट अवतार समोर आला आहे.    ओरस गावातील ‘अल्याड-पल्याड’च्या गूढ आणि थरारक घटनांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा ‘दिल्या’ आता ‘घबाडकुंड’ युनिव्हर्समधील नव्या कथेत पुन्हा एकदा भेटणार आहे. भुतांच्या भयावह अनुभवांनंतर गाव सोडून नव्या ठिकाणी ...

कुमार सोहोनी यांची१२५ वी नाट्यकृती ...'भुल भुलैय्या’

इमेज
  नाट्य दिग्दर्शन क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे कुमार सोहोनी.. त्यांच्या प्रदीर्घ नाट्य कारकिर्दीकडे पाहिलं तर ती सतत प्रयोगशील राहणाऱ्या नाट्य प्रयोगशाळेसारखीच वाटते. नवनवीन संहितांचा शोध, नवोदित कलाकारांना संधी आणि सादरीकरणात सातत्याने वैविध्य आणण्याची त्यांची दृष्टी नेहमीच प्रकर्षाने दिसून येते. अशा या प्रयोगशील दिग्दर्शकाच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांचं १२५वं नाटक… ‘भुल भुलैय्या’.   तब्बल ५३ वर्षांची अखंड नाट्यसेवा आणि १२५ नाट्यकृतींचा समृद्ध अनुभव पाठीशी असलेल्या सोहोनी यांनी ‘भुल भुलैय्या’ या नव्या नाटकाद्वारे एक वेगळी दिशा शोधण्याचा प्रयत्न केला आहे.     ‘भुल भुलैय्या’ नाटकाचे निर्माते असलेले केदार सामंत आणि रणजीत देसाई हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील असून ‘बाबा वर्दम थिएटर्स’ या हौशी नाट्य संस्थेशी गेली अनेक वर्षे जोडलेले आहेत. ही संस्था ५४ वर्षांपासून हौशी व प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत आहे. या संस्थेमार्फत दोघेही गेली २८ वर्षे नाट्यक्षेत्रात सक्रिय आहेत. राज्यभरातील कलाकारांना व्यावसायिक रंगभूमीवर संधी मि...

प्रविण विठ्ठल तरडेंचे दिग्दर्शन आणि मोहन जोशींचे 'स्वामी'रूप; 'देऊळ बंद २' साठी प्रेक्षक उत्सुक.

इमेज
    बहुप्रतिक्षित "देऊळ बंद 2" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आली व त्यामुळे स्वामीभक्त आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आनंदाबरोबरच उत्सुकता वाढली असतानाच आज "देऊळ बंद 2" चे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आणि आनंदात अजूनच भर पडली. "देऊळ बंद" मध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी आपल्या सशक्त अभिनयाने आणि आवाजाने स्वामी समर्थ अक्षरशः प्रत्यक्षात आपल्या समोर उभे राहून आपल्याशी संवाद साधत आहेत असे प्रेक्षकांना वाटत होते. तेच सर्वांना "देऊळ बंद 2" मध्ये अनुभवायला मिळणार आहे, कारण या भागात सुद्धा मोहन जोशी हेच श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत तर महत्त्वपूर्ण भूमिकेत अभिनेत्री स्नेहल तरडे त्यांच्या सोबत असणार आहेत.   वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित "देऊळ बंद २ - आता परीक्षा देवाची" च्या पहिल्या पोस्टरमध्ये प्रसन्न मुद्रेने हात उंचावत स्वामी दुचाकीवर मागे बसले असून अभिनेत्री स्नेहल तरडे ती दुचाकी चालवत आहेत. स्वामी जरी प्रसन्न मुद्रेत असले तरी स्नेहल यांच्या च...

'राजा शिवाजी’ चित्रपटाचे पहिले गाणे राजा शिवाजी अँथम "छत्रपती"आज प्रेक्षकांच्या भेटीला.

इमेज
 इतिहासाच्या तेजस्वी वारश्याला भव्य आणि भावपूर्ण स्वरूपात साकार करणाऱ्या ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपटाचे पहिलं गाणं राजा शिवाजी अँथम "छत्रपती" आज अधिकृतरीत्या प्रदर्शित करण्यात आले आहे. 'जिओ स्टुडिओज्' आणि 'मुंबई फिल्म कंपनी' यांच्या संयुक्त विद्यमाने, देश म्युझिक आणि वॉर्नर म्युझिक इंडियाच्या माध्यमातून सादर झालेले हे गीत प्रेक्षकांसाठी एक अद्वितीय संगीतमय अनुभव ठरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याच्या तेजस्वी वारश्याला समर्पित असलेले हे गीत, केवळ एक गाणे नसून शौर्य, अभिमान आणि इतिहासाचा भव्य संगम आहे.    प्रख्यात संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या या मराठी आणि हिंदी भाषिय आवृत्ती साठी अजय गोगावले यांच्या दमदार आणि भावस्पर्शी आवाजाची जोड लाभली आहे. आणि महत्वाचं म्हणजे हिंदी गाणं शब्दबद्ध केलं आहे नामांकित गीतकार मनोज मुंतशिर यांनी, जे आजच्या भारतीय अस्मितेचं एक प्रतिक ठरणार आहे. तब्बल ८० गायकांच्या समूहाने साकारलेले हे गीत श्रवणीय भव्यतेचा उच्चांक गाठते. गीतातील प्रत्येक स्वर,...

इलैयाराजा यांचं संगीत पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या बायोपिकला.

इमेज
   दलित पँथर आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित 'ढसाळ' या बहुप्रतीक्षित चरित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या प्रतिक्षेला पूर्णविराम मिळाला असून, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती’च्या निमित्ताने या चित्रपटाचे भव्य पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. मुंबईत हजारोंच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीखही जाहीर करण्यात आली असून, येत्या १ ऑक्टोबर २०२६ मध्ये हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. 'ढसाळ'मध्ये ललित प्रभाकर नामदेव ढसाळ यांच्या भूमिकेत झळकणार असून, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमधून त्यांच्या लूकची प्रभावी झलकही समोर आली आहे. ललित प्रभाकरच्या या भूमिकेकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले असून, त्याने साकारलेला ढसाळांचा बंडखोर आणि तडफदार आविष्कार प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. संजय पांडेय आणि दि बायोस्कोप फिल्म्स प्रस्तुत वरुणा मदनलाल राणा निर्मित या चित्रपटात दलित पँथर चळवळीचे प्रणेते, विद्रोही कवी पद्मश्री नाम...

‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ.

इमेज
   युवावर्गाची ऊर्जा, बिनधास्त अटिट्यूड आणि भन्नाट लय यांचा परफेक्ट संगम असलेलं ‘कारट्या’ गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत ‘बाप्या’ या आगामी चित्रपटातील हे नवं रॅप गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून, अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. विशेषतः तरुणांमध्ये या गाण्याची क्रेझ झपाट्याने वाढताना पाहायला मिळतेय.    या गाण्याच रॅपसोबतच आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे, त्याची अफलातून दृश्य मांडणी. आजवर अनेक रॅप गाणी आली असली तरी ‘कारट्या’ हे गाणं आपल्या वेगळ्या चित्रणशैलीमुळे ठळकपणे उठून दिसतेय. या गाण्याचं चित्रीकरण एक्स्ट्रा वाइड डायनॅमिक कॅमेरा लेन्सिंगमध्ये करण्यात आलं असून, मोठ्या पडद्यावर पाहाताना हा अनुभव अक्षरशः भव्य वाटेल. विशेष म्हणजे, या गाण्यासाठी पहिल्यांदाच इंस्टा ३६० कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रत्येक फ्रेममध्ये वेगळेपणा आणि नवी ऊर्जा जाणवते.    समुद्रकिनाऱ्यावर चित्रीत केलेली रंगतदार दृश्यं, सतत बदलणारे अँगल्स, विस्तृत फ्रेम्स आणि अनोख्या कॅमेरा हालचालींमुळे ‘कारट्या’ हे ग...

नाट्यगृह भाडेवाढीवर निर्मात्यांचा आक्षेप; स्थगितीची मागणी.

मुंबई महानगरपालिकेच्या नाट्यगृहांच्या भाड्यात १ एप्रिल २०२६ पासून करण्यात आलेल्या सुमारे रु.४,००० पर्यंतच्या वाढीव निर्णयावर नाट्यनिर्मात्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. यासंदर्भात अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या वतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देत ही भाडेवाढ तात्काळ स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे.    निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, दरवर्षी ५% भाडेवाढ करण्याचे नियोजन असताना त्यावर सखोल चर्चा होणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत नाट्यनिर्माते तिकीट दर रु.५०० च्या पुढे वाढवू शकत नाहीत. कारण रु. ५०० पेक्षा अधिक दर ठेवल्यास जीएसटी लागू होतो, ज्याचा आर्थिक भार निर्मात्यांवर येतो.     याशिवाय, दरवर्षी ५% भाडेवाढ सुरू राहिल्यास पुढील ५ ते ७ वर्षांत नाट्यगृहांचे भाडे मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम नाट्य व्यवसायावर होऊ शकतो. त्यामुळे सध्याची भाडेवाढ स्थगित करून पुढील काळात दर तीन वर्षांनी ५% भाडेवाढ लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.    नाट्यव्यवसाय टिकवण्यासाठी आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी महानगरपालि...