पोस्ट्स

श्री स्वामी समर्थ शक्ती स्थान (मठ), अर्नाळा, येथे बुधवार, दिनांक २९ जुलै २०२६ रोजी गुरूपौर्णिमा उत्सव.

इमेज
   नूतन गुळगुळे फाउंडेशनच्या वतीने 'श्री स्वामी समर्थ शक्ती स्थान' (मठ), फॅक्टरी पाडा समोर, अर्नाळा, विरार पश्चिम येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे. यावर्षीही श्रींच्या पादुकांवर अभिषेक करण्याचा संकल्प करण्याचे योजिले आहे. या अभिषेक संकल्पात भाविकांनी सहभागी व्हावे यासाठी श्री स्वामी समर्थ शक्ती स्थानातर्फे आवाहन करण्यात आले आहे. बुधवार, दिनांक २९ जुलै २०२६, रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत अभिषेक होणार असून भाविकांना स्वहस्ते अभिषेक करायचा असेल तर त्यांनी आपली नावे व  गुरु दक्षिणा रु २५१/- खालील नंबरवर पाठवून नोंदणी करावी असे कळविण्यात आले आहे. तसेच भंडाऱ्याचा 'सुखा शिदा' द्यायचा असेल तरीही संपर्क करावा. या दिनी मठात श्री साईबाबांच्या पवित्र द्वारकामाई मशीद व धुनीचे चलचित्र पाहण्यास मिळणार असून कीर्तनकार श्री व सौ.गोखले- तळेगाव यांचे कीर्तन ठेवण्यात आले आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क: सौ मेघा घोडे : ८१४९४७४९९१

'द्विधा'मधून निमिष कुलकर्णीच मराठी चित्रपटात पदार्पण.

इमेज
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमामुळे अभिनेता निमिष कुलकर्णी घराघरांत पोहोचला. आपल्या सहजसुंदर अभिनयशैली आणि अचूक विनोदी टायमिंगमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. ‘मर्डरवाले  कुलकर्णी’ या मराठी नाटकानंतर हिंदी चित्रपट 'अग्नि'मध्ये तो झळकला. सध्या 'सनई चौघडे' मालिकेतील त्याच्या गाजणाऱ्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता तो 'द्विधा' या आगामी मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दमदार पदार्पण करणार आहे. येत्या २१ ऑगस्टला 'द्विधा' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. आदित्य (आदि) व्यक्तिरेखा या चित्रपटात तो साकारत आहे. मनाने प्रेमळ, समजूतदार आणि विश्वासू असलेला आदि कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारा शांत आधार आहे. आदि हा श्रावणीचा आत्येभाऊ. बालपणापासून एकत्र वाढल्यामुळे त्यांच्या नात्यात प्रेम, विश्वास आणि अनेक सुंदर आठवणींची घट्ट वीण आहे.तो इतरांप्रमाणे जास्त बोलत नाही; पण प्रत्येकाच्या मनातील न बोललेले भाव अचूक ओळखण्याची त्याच्यात विलक्षण संवेदनशीलता आहे. कधी कधी सर्वात मोठा आधार हा मोठ्या शब्दां...

विदर्भाचा युवा दिग्दर्शक ठरतोय मराठी हॉररचा नवा चेहरा.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने नवे प्रयोग करत यशाची नवी उंची गाठणाऱ्या युवा दिग्दर्शकांमध्ये प्रीतम एस. के. पाटील यांचे नाव आज अग्रक्रमाने घेतले जाते. 'अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या दमदार यशानंतर आता 'घबाडकुंड' ला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादाने त्यांनी सलग दोन यशस्वी हॉररपट देत मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विदर्भातील यवतमाळसारख्या शहरातून आलेल्या प्रीतम पाटील यांनी आपल्या कल्पक दिग्दर्शनाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. शॉर्ट फिल्म्स, वेबसिरीज तसेच 'खिचिक', 'डॉक्टर डॉक्टर' आणि 'ढिशक्यांव' यांसारख्या चित्रपटांनंतर 'अल्याड पल्याड' आणि 'घबाडकुंड' या दोन सलग यशस्वी हॉररपटांनी त्यांच्या नावावर बॅक-टू-बॅक हिट्सची नोंद झाली आहे.    विशेष म्हणजे, 'घबाडकुंड' च्या माध्यमातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला पहिले सिनेमॅटिक युनिव्हर्स दिले. भय, रहस्य, अॅक्शन, इमोशन आणि थराराचा अनोखा मिलाफ असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, बॉक्स ऑफिसवरही चित्...

ग्रॅमी पुरस्कार विजेते पद्मश्री श्री.शंकरजी महादेवन आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सन्मानित रीवा राठोड यांच्या सुमधुर स्वरांतून साकारलेलं भक्तिगीत प्रेक्षकांच्या भेटीला,

इमेज
आषाढी वारीचे भक्तिमय वातावरण, विठ्ठल नामाचा अखंड गजर आणि वारकऱ्यांच्या अढळ श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव देणारं ‘पालखी निघाली वारीला’ हे नवीन भक्तिगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. नुकतेच या गाण्याचे अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. विठ्ठलनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि वारकऱ्यांच्या अखंड भक्तीभावात रंगलेलं हे गाणं प्रत्येकाला वारीचा आध्यात्मिक अनुभव देत आहे.     या गाण्याला सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि मधुर आवाजाची गायिका रीवा राठोड यांनी आपल्या सुरांनी समृद्ध केलं आहे. ज्येष्ठ गायक-संगीतकार रूप कुमार राठोड आणि गायिका सुनाली राठोड यांची कन्या असलेल्या रीवाने या गीताच्या माध्यमातून प्रथमच मराठीत गायन केलं असून, तिच्या सुरेल आवाजाने या भक्तिगीताला एक वेगळीच भावस्पर्शी उंची मिळाली आहे. ज्येष्ठ संगीतकार रूप कुमार राठोड यांनी या गाण्याला संगीत दिलं असून, डॉ. दीपक वझे यांनी विठ्ठलभक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचं सार शब्दांत प्रभावीपणे मांडलं आहे.या गाण्याची सुंदर ध्वनिचित्रफित सौ.श्वेता परुळकर यांनी केली आहे.हे गाणे डीएफएफने प्र...

'द इंडिया स्टोरी : स्लो पॉइझन इन प्रोग्रेस'चा ट्रेलर प्रदर्शित..

इमेज
'द इंडिया स्टोरी : स्लो पॉइझन इन प्रोग्रेस' या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला असून, कीटकनाशक शेतीच्या गंभीर समस्येवर आणि तिच्या समाजावर होणाऱ्या दूरगामी परिणामांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रभावी भूमिका असलेला हा चित्रपट दडलेले सत्य उलगडत लाखो लोकांच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या वाढत्या संकटाची जाणीव करून देतो. दमदार नाट्य, प्रभावी अभिनय आणि सामाजिक आशयाने परिपूर्ण असा हा ट्रेलर सत्य, न्याय आणि जिद्दीच्या प्रेरणादायी प्रवासाची झलक दाखवतो. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज यांच्या सहकार्याने साकारलेल्या 'द इंडिया स्टोरी' या चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन डीके यांनी केले असून, कथा, पटकथा आणि निर्मिती सागर बी. शिंदे यांची आहे. हा चित्रपट २४ जुलै २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.   ट्रेलरबद्दल बोलताना दिग्दर्शक चेतन डीके म्हणाले, "'द इंडिया स्टोरी' हा केवळ चित्रपट नाही, तर समाजाने करायलाच हवा असा एक महत्त्वाचा संवाद आहे. प...

नीलमताई शिर्के - सामंत,यांचा दिवंगत सचिन माने, यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात .

इमेज
आचार्य अत्रे रंगमंदिराचे साऊंड ऑपरेटर कै. सचिन माने यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंब संकटात सापडले होते. आज त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार दिला. कुटुंबाला 'श्री श्री बालाजी' संस्थेतर्फे १ लाख रुपये आणि बालरंगभूमी परिषद, मध्यवर्तीतर्फे १०,००० रुपयांची आर्थिक मदत दिली. इतकेच नव्हे, तर त्यांच्या पत्नीला नोकरी आणि मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. या कठीण काळात आम्ही माने कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

'सामना' या चित्रपटाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आणि स्व.निळू फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'सामना' या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन…

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते स्वर्गीय निळू फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि सामना या चित्रपटास ५० वर्षे पूर्ण झाली या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त 'महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळा'च्या 'दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळा'तर्फे सामना' या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आणि चित्रपट निर्माते रामदास फुटाणे व दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्याशी संवाद आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम शनिवार दि.१८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथील तिसऱ्या मजल्यावरील लघुनाट्यगृहात होणार आहे.   मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड  ठरलेल्या या चित्रपटात डॉ.श्रीराम लागू आणि निळू फुले यांची प्रमुख भूमिका असून रामदास फुटाणे यांनी निर्माता म्हणून तर डॉ. जब्बार पटेल यांचं दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाद्वारे चित्रसृष्टीत पदार्पण केलं. चित्रपटाची कथा विजय तेंडुलकर यांनी लिहिली असून संगीत हे पंडित भास्कर चंदावरकर यांनी दिले आहे . तसेच  या चित्रपटात मोहन आगाशे, विलास रकटे,  स्मिता पाटील अशा मान्यवर कलाकारांनीही...