पोस्ट्स

लहानग्यांच्या निरागस आवाजात पहिल्यांदाच ‘श्री स्वामी समर्थ तारक मंत्र’.

इमेज
राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रवींद्र हिने सुरू केलेल्या ‘सावनी रेकॉर्डझ’ या म्युझिक लेबलची दुसरी कलाकृती आता स्वामीभक्तांच्या भेटीला आली आहे. ‘मुजरा शिवबाला’ या पहिल्याच सादरीकरणाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता ‘श्री स्वामी समर्थ तारक मंत्र’ या आगळ्यावेगळ्या कलाकृतीचे प्रकाशन करण्यात आले असून, या मंत्राची सर्वात मोठी खासियत म्हणजे पहिल्यांदाच लहान मुलींच्या निरागस आवाजातून हा प्रभावी तारक मंत्र सादर करण्यात आला आहे.    आजवर ‘श्री स्वामी समर्थ तारक मंत्रा’च्या अनेक आवृत्त्या रसिकांसमोर आल्या. मात्र त्या सर्व प्रौढ गायकांच्या आवाजात होत्या. पुढील पिढीपर्यंत अध्यात्म, संस्कार आणि भक्ती सहजपणे पोहोचावी, या उद्देशाने सावनी रवींद्रने या मंत्राला बालस्वरांचे रूप दिले आहे. त्यामुळे हा मंत्र  भक्तीचा अनुभव देतानाच मुलांच्या मनात संस्कारांची बीजही सहज रुजवतो.या अनोख्या संकल्पनेविषयी सावनी रवींद्र म्हणते, “आजवर तारक मंत्राची अनेक व्हर्जन्स युट्युबवर आली आहेत आणि ती सगळी मोठ्यांनी गायली आहेत. पण पुढच्या पिढीवर संस्कार होणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि ...

मामाचा गोवा सुसाट वेगात...थिएटर्सची संख्या पहिल्या आठवड्यात १७० तर दुसऱ्या आठवड्यात २००च्या वर.

इमेज
   प्रदर्शनानंतर प्रेक्षक, समीक्षक आणि सिनेसृष्टीतील मान्यवरांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या दमदार माऊथ पब्लिसिटीमुळे चित्रपटाकडे नव्या प्रेक्षकांचा ओघही वाढत असून, कॉमेडी, अॅक्शन, सस्पेन्स, भावना आणि भरपूर मनोरंजनाचा सुरेख मेळ साधणाऱ्या या चित्रपटाला ‘परफेक्ट फॅमिली एंटरटेनर’ म्हणून पसंती मिळत आहे. दैनंदिन धकाधकीतून दोन तासांचा निव्वळ आनंद देणारा हा चित्रपट अनेकांसाठी खरा ‘स्ट्रेसबस्टर’ ठरत आहे. अर्थात स्क्रीन मिळावेत या विनंतीनंतर तुरळक ठिकाणी सोशल मीडियावर ट्रोल झालेल्या या सिनेमाच्या थिएटर्सची संख्या पहिल्या आठवड्यात १७० होती ती आता दुसऱ्या आठवड्यात २०० च्या वर गेली आहे. याचाच अर्थ प्रेक्षकांनी ‘परदेशी’ सिनेमाकडून ‘देशी’ कडे मोर्चा वळवलाय. “खऱ्या अर्थाने एंटरटेनर फिल्म,” “सुरुवातीपासून शेवटपर्यंत नुसते हसलो,” अशा प्रतिक्रिया देत प्रेक्षक चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत. चित्रपट पाहून बाहेर पडलेले प्रेक्षक आपल्या मित्र-परिवारालाही हा चित्रपट पाहाण्याची शि...

नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते "भाटा" चित्रपटाचे पोस्टर लाँच.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या धाटणीचे विषय हे आवर्जून हाताळले जातात. फार कमी लोकांना माहित असेलल्या बेलदार ह्या भटक्या जमातीतील लोकांचा संघर्षमय जीवनप्रवास आगामी "भाटा" या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले (मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग  महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर) यांच्या हस्ते लाँच करण्यात आले. येत्या २८ ऑगस्टला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.   व्ही. डि. एंटरटेनमेंट आणि मोरया उद्योग समूह यांनी या चित्रपटाची  प्रस्तुती केली असून अरायव्हल स्टुडिओ प्रा. लि. या निर्मिती संस्थेने "भाटा" या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  सुनील आबा जाधव आणि विजय चंद्रकांत चव्हाण हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. रिजवान शेख,  नितेश पराडकर, सुनील सुनील कातकर हे  या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. भरतराज नारायण यादव यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून सहदिग्दर्शन अक्षय सुतार  यांचे आहे. या चित्रपटाची कथा विजय चंद्रकांत चव्हाण यांची आहे, तर पटकथा ...

शैलेश नरवाडे घेऊन येताहेत लोकप्रिय "जयंती" चित्रपटाचा दुसरा भाग.

इमेज
आजच्या या तरुण पिढीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा पडणारा प्रभाव आणि विचारांमधून समाजात होणारा सकारात्मक बदल यावर भाष्य करणारा "जयंती" हा चित्रपट २०२१ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला होता. आता तब्बल पाच वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच "जयंती २" हा चित्रपट येत्या ११ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. "जयंती २" या चित्रपटाची निर्मिती मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओने केली असून चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन शैलेश बळीराम नरवाडे यांचे आहे. "जयंती" चित्रपटाचा प्रमुख चेहरा असलेला अभिनेता ऋतुराज वानखेडे या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारत असून अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, रोहिणी हट्टंगडी, देविका दफ्तरदार, विजय निकम, राजकुमार जरांगे, मानसी सुभाष अशी दमदार कलाकारांची फौज आपल्याला या चित्रपटातून भेटीस येणार आहे. संजीवकुमार हिल्ली यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून संकलन फैसल महाडिक यांचे आहे. डॉ. स...

‘समर्थ’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित.

इमेज
समर्थ विचारांनी अनेक पिढ्यांना जीवन जगण्याची प्रेरणा दिली. त्याच विचारांचा आधुनिक संदर्भात अर्थ उलगडणारा आगामी मराठी चित्रपट ‘समर्थ’ आता आणखी एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. चित्रपटाचा दमदार आणि भावस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित झाला असून टीझरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता आता आणखी वाढली आहे. नात्यांतील ताण, दोन पिढ्यांतील विचारांचा संघर्ष आणि समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीतून आयुष्याला मिळणारी नवी दिशा यांचा प्रभावी संगम या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. ट्रेलरमधून ही कथा एका सामान्य कुटुंबाची असल्याचे दिसतेय. आयुष्याच्या एका टप्प्यावर अध्यात्माचा स्वीकार करणारे वडील आणि त्यांच्या विचारांना विरोध करणारा मुलगा यांच्यातील संघर्ष अधिक यात ठळकपणे समोर येतो. बदलत्या काळात नात्यांमधील संवाद कसा हरवत चालला आहे, कुटुंबात निर्माण होणारा दुरावा किती खोलवर जातो आणि अशा वेळी समर्थ रामदास स्वामींची शिकवण माणसाला स्वतःकडे नव्याने पाहाण्याची ताकद कशी देते, याची भावनिक आणि प्रेरणादायी झलक ट्रेलरमध्ये अनुभवायला मिळते. केवळ अध्यात्माची मांडणी न करता, आधुनिक जीवनातील वास्तव, भावनिक संघर्ष, नात्या...

मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट,फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने क्रांती रेडकर वानखेडे लिखित-दिग्दर्शित ‘मैत्रेया’ची घोषणा...

इमेज
‘मैत्री’ हा शब्द उच्चारताच प्रत्येकाच्या आयुष्यातील काही चेहरे नकळत डोळ्यांसमोर येतात. काही नाती काळासोबत बदलतात, काही हरवतात, तर काही आयुष्यभर मनात घर करून राहातात. अशाच एका मैत्रीच्या प्रवासाची झलक फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने समोर आली आहे. समर टाईम्स प्रॉडक्शन निर्मित ‘मैत्रेया’ या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा उत्सुकता वाढवणाऱ्या पोस्टरद्वारे करण्यात आली आहे. ‘काकण’ या संवेदनशील चित्रपटानंतर लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे पुन्हा एकदा एका नव्या विषयासह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाची निर्मिती मनोज खळतकर यांनी केली आहे. ‘मैत्रेया’च्या पोस्टरवरून हा चित्रपट समर, आयुषी, स्काय आणि रुची या कलाकारांनी साकारलेल्या पात्रांच्या आयुष्याभोवती फिरणार असल्याची झलक पाहायला मिळते. पोस्टरमध्ये या चार कलाकारांची नावं समोर आली आहेत. या चौघांच्या नात्याची गोष्ट नेमकी काय असणार, याबाबत मात्र अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. याचा उलगडा लवकरच होणार असून, चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.    लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे म्हणतात, “...

अर्नाळ्यातील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिभावात संपन्न; मानवसेवेचा संदेश ठरला केंद्रस्थानी.

इमेज
 प्रभात कॉलनी, अर्नाळा येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहात संपन्न झाला. अभिषेक, महापूजा, आरती, नामस्मरण, दर्शन तसेच ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. सदानंदबुवा गोखले यांच्या प्रभावी कीर्तनाने परिसर भक्तिमय झाला. त्यांनी आपल्या कीर्तनातून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या विचारांचा, सदाचाराचा आणि मानवतेच्या संदेशाचा प्रभावी जागर केला. यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रगतीबरोबरच माणुसकी, करुणा आणि संवेदनशीलता जपणे हीच काळाची खरी गरज असल्याचा संदेश देण्यात आला. श्री स्वामी समर्थ महाराजांची शिकवण सत्य, सेवा, प्राणीमात्रावरील प्रेम आणि मानवकल्याणाचा मार्ग दाखवणारी असल्याचेही सांगण्यात आले.   स्थानिक परंपरेनुसार, सन १८०० च्या सुमारास श्री स्वामी समर्थ महाराजांनी अर्नाळा परिसरात वास्तव्य केले होते. त्याच दैवी प्रेरणेतून श्री विनायक गुळगुळे व सौ. नूतन गुळगुळे यांनी सन २०१५ मध्ये गजलक्ष्मी स्वरूप कमळासनाधिष्ठित श्री स्वामी समर्थ शक्तीस्थानाची स्थापना केली.    या शक्तीस्थानातील 'स्वानंद सेवा सदन' या उपक्रमाद्वारे ग्रामी...