पोस्ट्स

सुगी परिवारातर्फे प्रख्यात गायक श्री. राहुल देशपांडे आणि आर्या आंबेकर यांच्या साथीने सुरेल दिवाळी पहाटचे आयोजन; 12 नोव्हेंबर 2023 रोजी दादर येथील पार्क क्लबच्या मागे रंगणार मैफल.

इमेज
मुंबई, 10 नोव्हेंबर, 2023: दिवाळी साजरी करण्यासाठी चमकदार वातावरण निर्मिती करत, मुंबईतील आघाडीचा रिअल इस्टेट विकासक समूह 'सुगी ग्रुप’ने, 12 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळीच्या पहिल्या दिवशी अर्थात नरकचतुर्दशीला मुंबईकरांसाठी संगीताच्या मेजवानीचे आयोजन केले आहे. परंपरेनुसार 'दिवाळी पहाट’ म्हणून ओळखला जाणारा हा सोहळा सकाळी सहा वाजता होणार आहे. सुगी परिवाराने ही संगीताची मैफल सर्व रसिकांसाठी तसेच संगीताच्या चाहत्यांसाठी खुली ठेवली असून, 5000हून अधिक संगीतप्रेमी दिवाळीच्या पहिल्या दिवशी या दिवाळी पहाट समारंभाला उपस्थिती लावतील असे अपेक्षित आहे. या अनोख्या ‘सांगितिक पहाट’चे आयोजन मोठ्या आनंदाने करणारे सुगी ग्रुपचे संस्थापक व व्यवस्थापकीय भागीदार श्री. निशांत देशमुख म्हणाले, “सुगी परिवाराच्या माध्यमातून आपली संस्कृती, परंपरा व वारसा उभारण्यासाठी तसेच जतन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो, जेणेकरून, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध समाज घडवला जाईल. मुंबईतील, विशेषत: दादरमधील, सर्व वयोगटांतील नागरिकांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही या सोहळ्याचे आयोजन केले आ...

अशी सापडली 'नाळ भाग २'मधील चिमी !

इमेज
ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते, तो झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित 'नाळ भाग २' अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील गाणी, ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या सगळ्यात आणखी एक व्यक्तिरेखा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे, ती म्हणजे चिमुकली चिमी म्हणजेच त्रिशा ठोसर. ‘डराव डराव’ गाणे प्रदर्शित झाले आणि या गाण्यातील ही चिमुकली कोण असा सगळ्यांना प्रश्न पडला. तिचा तो तोरा बघून अनेक जण तिचे चाहते झाले. एवढ्या लहानग्या, गोंडस, निरागस त्रिशाची निवड 'चिमी'च्या व्यक्तिरेखेसाठी कशी झाली, हे जाणून घेण्यासाठी अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत.  त्रिशाच्या निवडीबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी म्हणतात, ''मी, नागराज मंजुळे आणि आमची टीम चित्रपटासाठी कलाकारांची निवड करतो. ज्यावेळी 'चिमी'ची व्यक्तिरेखा लिहिली गेली आणि तिचा शोध सुरु झाला त्यावेळी आम्ही वयाची मर्यादा ठेवली नाही. आमच्या डोक्यात एकच होते ती मुलगी जितकी लहान असेल तितके उत्तम. त्या दृष्टीने आमचे शोधकार्य सुरु होते. अने...

अशी सापडली 'नाळ भाग २'मधील चिमी !

इमेज
ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते, तो झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित 'नाळ भाग २' अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील गाणी, ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या सगळ्यात आणखी एक व्यक्तिरेखा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे, ती म्हणजे चिमुकली चिमी म्हणजेच त्रिशा ठोसर. ‘डराव डराव’ गाणे प्रदर्शित झाले आणि या गाण्यातील ही चिमुकली कोण असा सगळ्यांना प्रश्न पडला. तिचा तो तोरा बघून अनेक जण तिचे चाहते झाले. एवढ्या लहानग्या, गोंडस, निरागस त्रिशाची निवड 'चिमी'च्या व्यक्तिरेखेसाठी कशी झाली, हे जाणून घेण्यासाठी अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत.  त्रिशाच्या निवडीबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी म्हणतात, ''मी, नागराज मंजुळे आणि आमची टीम चित्रपटासाठी कलाकारांची निवड करतो. ज्यावेळी 'चिमी'ची व्यक्तिरेखा लिहिली गेली आणि तिचा शोध सुरु झाला त्यावेळी आम्ही वयाची मर्यादा ठेवली नाही. आमच्या डोक्यात एकच होते ती मुलगी जितकी लहान असेल तितके उत्तम. त्या दृष्टीने आमचे शोधकार्य सुरु होते. अने...

https://ultrajhakaas.app.link/

इमेज

बाल दिवसाचं औचित्य साधून ‘अल्ट्रा झकास’ घेऊन येत आहे बालकांसाठी ‘बर्फाची राणी’ चित्रपट.

इमेज
       पृथ्वीतलावर जगत असताना काय चांगलं आणि काय वाईट ही समजूत कोवळ्या वयात जर मुलांच्या अंगी आली, तर माणसाची माणुसकी पृथ्वीवर कायम टिकून राहिल. म्हणूनच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म आणि बाल दिवसाचं औचित्य साधून १४ नोव्हेंबर २०२३ रोजी लहान मुलांना माणूसपन शिकवणारा हॉलिवूडचा अॅनिमेटेड चित्रपट ‘बर्फाची राणी’ अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर येत आहे.        चित्रपटाची कथा एका मोठ्या राज्यातील राजा, जादूगर आणि बर्फात बंदिस्त झालेली शापित राणी यांच्या भोवती फिरते. गेर्डा ही एका सामान्य जादूगाराच्या घरात जन्मलेली असामान्य मुलगी आहे, जिला तूर्तास तिच्यात असणाऱ्या जादुई कौशल्याचे ज्ञान नाही. राजाने राज्यातील सर्व जादूगारांना धनाचे आमिष दाखवून बर्फाच्या राणीच्या जगात बंदिस्त केले आहे, जिथून कोणीही परत येऊ शकत नाही. त्यात गेर्डाचे आई वडील आणि भाऊही आहे. गेर्डा आपल्या कुटुंबाला सोडवण्यात यशस्वी होईल का? हे चित्रपटात कळणार आहे. “पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मरणार्थ आणि बाल दिवसानिमित्त बालकांना मनोरंजनासोबतच माणूस म्हणून जगण्याची चांगली शिकवण देणारा...

मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया च्या महाराष्ट्रातील विभागवार संघटन सचिव,संयुक्त संघटन सचिवपदी अभ्यासू माध्यमकर्मींना जबाबदारी.

इमेज
मुंबई/प्रतिनिधी:   'मीडिया असोसिएशन ऑफ  इंडिया'च्या राज्यातील महसूल विभागनिहाय संघटन सचिव व संयुक्त संघटन सचिव यांच्या निवडी संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्षा शीतलताई करदेकर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली घोषित करण्यात आल्या.    'मीडिया असोसिएशन ऑफ  इंडिया'चे मुंबई विभाग संघटन सचिव सचिन चिटणीस तर संयुक्त संघटन सचिव- चेतन काशीकर,अनिल चासकर,वैजंता मोरे यांना जबाबदारी देण्यात आली तर ठाणे पालघर विभागासाठी संघटन सचिव म्हणून वैशाली आहेर, प्रविण वाघमारे, कोकण विभागासाठी संयुक्त संघटन सचिव लक्ष्मीकांत घोणसे-पाटील,सुनिल कटेकर,तुषार गोसावी यांची नावे घोषित करण्यात आली आहेत.  औरंगाबाद संघटन सचिव डॉ.कादिर सोबत संयुक्त संघटन सचिव म्हणून भरत  मानकर ,विष्णू कदम यांना आणि नाशिक विभागासाठी संयुक्त संघटन सचिव म्हणून विठ्ठल भाडमुखे,चंद्रशेखर पाटील,अविनाश धुमाळ हे काम पहाणार आहेत. अमरावती विभागासाठी संयुक्त संघटन सचिव म्हणून राज मोहोरे आणि सुरेंद्रकुमार आकोडे काम करणार आहेत. पुणे विभागासाठीच्या संघटन सचिवपदी शेखर धोगडे व लक्ष्मण खटके तर संयुक्त संघटन सचिव ...

'फौज-द बॅटल ऑफ हिली' सांगणार भारतीय सैन्यांची शौर्यगाथा.

इमेज
१९७१ मध्ये भारत पाकिस्तानमध्ये झालेले एक महत्वपूर्ण युद्ध ठरले. याच युद्धावर आधारित 'फौज-द बॅटल ऑफ हिली' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून स्वामी चरण फिल्म्स, एम एन तातुसकर फिल्म्स प्रॉडक्शन, हर्ष जोशी प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांचे आहे. २०२४ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अशोक समर्थ, किरण गायकवाड, सोमनाथ अवघडे उत्कर्ष शिंदे, गणेश पदमाळे, श्रीकांत गायकवाड, प्रसाद सुर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर मयूर तातुसकर, कुशन जोशी, महेश करवंदे ( निकम), निलेश रमेश चौधरी आणि अमृता धोंगडे निर्माते आहेत.  हे युद्ध इतिहासातील एक महत्वाचे युद्ध ठरले. कारण या युद्धात भारताच्या विजयी झेंड्याची घोषणा करण्यात आली तसेच बांग्लादेश या नवीन देशाची स्थापनाही झाली. या सगळ्यात बलिदान दिलेल्या शूरवीर सैनिकांची शौर्यगाथा या चित्रपटाच्या माध्य्मातून आपल्या समोर येणार आहे.  चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, ''या पूर्वीही मी अशाच धाटणीचा...